Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू 

Spread the love

 

हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली.

यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे झाले आणि वाहनांचा चक्काचूर झाला.

बानावर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *