Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा

  कोल्हापूर : गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली …

Read More »

विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती

बेळगाव : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगाव शहरात विविध ठिकाणी विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने जनजागृती व ध्वज वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकत्र …

Read More »

मराठी पत्रकार संघातर्फे उद्या आचार्य अत्रे यांची जयंती

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या  शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर मधील पत्रकार संघाच्या कार्यालयात सदर कार्यक्रम होणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, …

Read More »

कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी

  खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाले आहेत. बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली

बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच शहरात तसेच तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी कॅम्प येथील सेंट जोसेफ शाळेच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत 100 तिरंगा ध्वज हातात घेवून विद्यार्थ्यांनी …

Read More »

75 मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली

  बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात तिरंगा झेंडे फडकत आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या लाखो स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे एक महान कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी मैदान, …

Read More »

हालात्री नदीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा संपन्न

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात झाला. या वर्षाचे नियोजन करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता. सर्वप्रथम सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर …

Read More »

पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर

आ. श्रीमंत पाटील : स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त ऐनापुरला रोपवाटप अथणी (प्रतिनिधी) : पर्यावरण व निसर्गसौंदर्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे निसर्गाचे सौंदर्य करायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी रोपटे लावले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने ऐनापुर येथे यापूर्वीच ट्री …

Read More »

कोगनोळी येथे पावसामुळे घरांची पडझड

कोगनोळी : सलग आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घरांचा सर्व्हे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. येथील अर्चना उत्तम कागले, आप्पासाहेब लगम्माना भोजे, सागर शिवाजी पंढरे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची घरे या पावसामध्ये पडले आहेत. यामुळे अनेकांचे …

Read More »