संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्लीतील मातीचे ढिगारं हटविण्याचे काम पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून केलेले नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यात आता झुडपे उगवलेली दिसताहेत. पालिकेचे एक काम बारा महिने थांब सारखा प्रकार चालल्याची तक्रार येथील लोकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील नागरिक रवि कंबळकर म्हणाले, मारुती …
Read More »श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान
संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा …
Read More »औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची …
Read More »बरगाव पंचायतीला टाळे ठोकताच पीडिओंनी दिले कामे करण्याचे आश्वासन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बरगाव पंचायतीकडून नागरिकांची कोणतीच कामे केली जात नव्हती. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक हैराण झाले होते. त्याचबरोबर बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील के. पी. पाटील प्लॉटमधील नागरिकांना उतारे देण्यास टाळाटाळ होत होती. गेली अनेक वर्षे उतारा मिळण्यासाठी के. पी. पाटील यांनी सतत बरगाव ग्राम पंचायतीला …
Read More »सीमाभागातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी
निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय …
Read More »मदरशांमध्ये मुलांना धर्मनिंदा करणार्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते : केरळ राज्यपाल आरिफ खान
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणार्या राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैया लालची तलवारीने गळा चिरून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारतात तालिबानी विचारसरणीच्या वाढत्या प्रसाराची सर्वांनाच चिंता आहे. मुस्लिम समाजातील एका वर्गातील वाढत्या सनातनी प्रवृत्तींवर टीका करायची की नाही? प्रश्न उपस्थित करायचे की नाही? असा विचार …
Read More »शिवसेनेवर टीकेचा बाण सोडणाऱ्या ओवेसींना तगडा झटका, एमआयएमचे 5 पैकी 4 आमदार फुटले!
पाटणा : असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एमआयएमला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या पाचपैकी चार आमदारांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी पाटणा येथे सांगितले की, आता आरजेडी बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तेजस्वी यादव हे बऱ्याच दिवसांपासून एमआयएम आमदारांच्या संपर्कात होते. राजदने बिहारमध्ये …
Read More »कंग्राळी खुर्दचे वारकरी पंढरीला रवाना
बेळगाव : ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषात बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील पायी वारी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दोन वर्षांच्या कालखंडानंतर विठू माऊलीच्या दर्शनाच्या आशेने आसुसलेल्या वारकर्यांच्या उत्साहात गावकर्यांच्या उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला. गेली तब्बल 11 वर्षे अखंडपणे कंग्राळी खुर्द येथील वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची …
Read More »नावगे येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
बेळगाव : किरकोळ कारणावरून मच्छीमार तरुणाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावात घडली. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करायला गेलेल्या एका मच्छीमारावर गावातीलच काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली. हुंच्यानट्टी येथील शंकर पाटील हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, हातांना दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांचा एक्झिट प्लॅन ठरला? पुन्हा शिवसेना-भाजप युती सरकारची नांदी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणीत पराभवाला सामोरं जाऊन नाचक्की करुन घेण्याऐवजी उद्धव ठाकरे आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta