बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावला आले आहेत. किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलमध्ये भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंदीगवाड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले. …
Read More »विधान परिषद प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्या बेळगावात
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. मंगळवार दि. 7 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षनेते आणि पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे राज्यप्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली आणि …
Read More »अलीकडे सिद्धरामय्या खोटे बोलण्यास शिकत आहेत : रमेश जारकीहोळी
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या …
Read More »काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »…तर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद; शिक्षण मंत्र्यांची माहिती
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही बंगळूर : राज्यातील विशेषत: शाळा, महाविद्यालयातील कोविड सकारात्मक प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर आवश्यक वाटल्यास, कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले. सोमवारी, (ता. 6) …
Read More »हलगा-मच्छे बायपासला कायमची स्थगिती
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज सोमवारी झालेली न्यायालयीन सुनावणी पूर्णपणे शेतकर्यांच्या बाजूने झाली असून न्यायालयाने दाव्याचा अंतरिम निकाल जाहीर होईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या सुनावणीमुळे बायपास रस्त्याच्या कामाला आता कायमचा ब्रेक लागला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत …
Read More »राज्यातल्या भाजप सरकारामुळे खानापूर तालुक्याचा विकास खुंटला
आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका निसर्ग प्रधान तालुका आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कुचकामी ठरले आहे. पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांनी 800 कोटी रूपयाचा निधी आणला असला तरी राज्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली …
Read More »माजी आम. कुडची पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल
बेळगाव : बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी रायबाग येथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. याप्रकारे काँग्रेसमधून निजदमध्ये गेलेले कुडची आता पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. रायबाग येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी …
Read More »तुकाराम बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव : शहापूर येथील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे हे होते. उपस्थित भागधारकांचे स्वागत संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी केले. बँकेचे कर्मचारी कै. सुनील पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बँकेचे जे सभासद, ठेवीदार व …
Read More »आपले ज्ञान वृद्धिंगत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य : प्रा. आनंद मेणसे
मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न बेळगाव : मी शिक्षक आहे म्हणजे इतरांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे ही भावना शिक्षकांच्यात निर्माण झाली पाहिजे, शिक्षक असल्याची जबाबदारी घेतल्यानंतर त्या विषयाची बांधीलकी मानून त्याविषयीचे आपले ज्ञान वृद्धिंगत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय व वनिता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta