Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव-आंबोली रस्त्याबाबत आमदार द्वयींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे. बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट …

Read More »

संकेश्वरातून ईटीची हकालपट्टी करा : राजू बांबरे

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे …

Read More »

संकेश्वरी मिर्ची लय भारी….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरी मिर्चीने आपला ठसका आणि झणझणीतपणा कायम राखत यंदा देखील संकेश्वरी मिर्चीने दरात नंबर वन कायम केलेले दिसताहे‌. त्यामुळे बाजारात संकेश्वरी मिर्ची लय भारी ठरली आहे. तीन दशकापूर्वी संकेश्वरी मिर्चीने अख्खी मुंबई बाजारपेठ काबीज केल्याचे आजही सांगितले जात आहे. त्यावेळी संकेश्वर राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये संकेश्वरी …

Read More »

सौंदलगा येथील मराठी मुलींच्या शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ उत्साहात

सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी मराठी मुलींच्या शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यानंतर विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीएमसीचे अध्यक्ष अजित कांबळे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते बाबू जगजीवनराम व सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …

Read More »

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बेळगाव आर. एस. एस. कार्यालयाला भेट

बेळगाव : बेळगाव येथे एका खासगी समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले असता कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बेळगाव येथील आर. एस. एस. मुख्यालयाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी कार्यालयाला भेट देऊन स्थानिक आर. एस. एस. पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी आपण कोणत्याही गावाला गेलो की …

Read More »

महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : गणेशपूर येथे रात्री ३ च्या सुमारास डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारती उपेंद्र यलगुद्री (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सदर महिलेने आपल्या मुलाने अभ्यास केला नसल्याने रागाच्याभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भारती यांनी गळ्याला फास आवळून आत्महत्या केल्याचे तिच्या …

Read More »

खानापूर सिव्हील इंजिनियर संघटनेची स्थापना

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सिव्हील इंजिनियर संघटनेची स्थापना गुरूवारी दि. ७ रोजी शिवस्मारक चौकातील सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुलम होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ, राजेंद्र मुतगेकर, लैला शुर्गसचे एमडी सदानंद पाटील, मांगरिश कंस्ट्रक्शनचे एम. …

Read More »

संकेश्वरात लिंबूच्या दरात वाढ!

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कागदी लिंबूला लोकांत मोठी मागणी दिसताहे. उन्हाचा चढता पारा लिंबू दरात वाढ करणारा ठरला आहे. बाजारात लिंबूची आवक घटली असून दरवाढ झालेली दिसत आहे. संकेश्वरात यंदा लिंबू दरांने उच्चांक गाठला असून कागदी लिंबूचा दर शेकडा ५०० ते १२०० रुपये झाला आहे. किरकोळ लिंबू विक्री दहा-बारा …

Read More »

संकेश्वरात श्री कालिकादेवी जात्रामहोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीतर्फे श्री कालिकादेवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज चैत्र पंचमीला सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. महामंगल आरती झाले नंतर गावातील प्रमुख मार्गे श्री कालिकादेवीचा पालखी उत्सव काढण्यात आला. यामध्ये रामबाग, अँथनी येथील मोहनेश आचार्य समुहाने परंपरागत …

Read More »

बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

बेळगाव : बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची पोर्टेबल वॉटर फिल्टर बनविणारा देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ‘निरनल’ हे सहज हाताळण्याजोगे जलशुद्धीकरण उपकरण (वॉटर फिल्टर) भारतातील सुरक्षित पिण्याचे पाणी संकल्पनेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. बेस्ट लीडर पुरस्कार मिळवणारा निरंजन आता पुढील वर्षापर्यंत …

Read More »