Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा कोटा वाढवून द्या

माजी महापौर सरिता पाटील यांची शरद पवार यांच्याकडे मागणी बेळगाव : माजी महापौर सरिता पाटील यांनी आज बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बेळगावसह सीमाभागातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असलेला कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. 95 साली सीमाभागातील लोकांसाठी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद

मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांना निरोप बेळगाव : जिल्‍हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बेंगळुरूला बदली झाली आहे. मावळते जिल्हाधिकारी हिरेमठ यांना आज प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हिरेमठ यांना निरोप तर नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना एम. जी. हिरेमठ म्हणाले …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय होणार “पेपरलेस”

बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगावसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तसेच वेगवेगळ्या उपाय योजना ते राबविण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी आता आपले कार्यालय ‘पेपरलेस ऑफिस’ करण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे शहराचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ऑफिस’मध्ये रूपांतर होणार आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्ला बेळगाव हा राज्यातील …

Read More »

आर्मी परिक्षा लवकर घेण्यासंदर्भात निवेदन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि संकेश्वर आर्मी अभिमानी बळगतर्फे आर्मी परिक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाची प्रत देशाचे संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंह यांना उपतहसीलदार यांचेमार्फत पाठवून देण्यात आली आहे. उपतहसीलदार यांना निवेदन सादर करुन बोलताना श्रीरामसेना हिन्दुस्तान हुक्केरी तालुका अध्यक्ष …

Read More »

प्रभाग १३ ची निवडणूक नको समझोता हवा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. उद्या गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता भाजपाचे नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, …

Read More »

‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्‍य’ पुरस्‍कार!, प. बंगालमधील साहित्‍यिक भडकले

कोलकाता : पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्‍चिम बांगला अकादमीने उत्‍कृष्‍ट साहित्‍यासाठी पुरस्‍कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार प्रदानही करण्‍यात आला. मात्र आता सरकारच्‍या या कृतीविरोधात अनेक साहित्‍यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्‍न राशिद बंदोपाध्‍याय यांनी २०१९ मध्‍ये मिळालेला पुरस्‍कार परत केला आहे. तर साहित्‍य …

Read More »

आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक!

नवी दिल्ली : दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या रोडावली असली तरी, देशात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. काही राज्यांमध्ये अद्यापही स्थिती चिंताजनक आहे. अशात रेल्वे विभागाने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाचे कार्यकारी …

Read More »

गर्लगुंजी माऊली यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली. बुधवारी दि. …

Read More »

शरद पवार – समिती नेत्यांच्यात सीमाप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा

बेळगाव : बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी बेळगावातील मराठा बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात भाग घेतल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याच दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसमवेत शरद पवार यांनी बैठक …

Read More »

स्वाभिमानाने जगले पाहिजे : खासदार शरद पवार

बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती …

Read More »