Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

आषाढातही ’शुभमंगल सावधान’!

कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी …

Read More »

सलग दुसर्‍या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने

घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट …

Read More »

कोगनोळी नाक्यावरील दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात

वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्‍या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा …

Read More »

हलशीसह इतर गावांना रुग्णवाहिका उपलब्ध देण्याची आग्रही मागणी

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हलशी व कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची सोय होणार आहे.खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत त्यामुळे अत्यावश्यक उपचाराची गरज असताना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून खानापूर तालुक्यातील अनेक …

Read More »

श्रीगणेशोत्सव संदर्भातील मार्गसुची त्वरित जाहीर करावी : भाजपा नेते किरण जाधव

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्रीगणेशोत्सवासंदर्भातील मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किरण जाधव यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन उपरोक्त विनंती पत्र …

Read More »

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाडात कचरा बकेट वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीच्यावतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनसाठी बकेटचे वितरण करण्यात आले.ही योजना भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये कचरा डेपो बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च …

Read More »

तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ऑनलाईन भजन स्पर्धा

बेळगाव : आषाढी एकादशी म्हणजे भारतातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा सण. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. याचेच औचित्य साधून बेळगावच्या महिलांसाठी तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्यावतीने ऑनलाईन नादब्रह्म भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व सामान्य महिलेने आत्मविश्वासाने पुढे यावे हा उद्देश ठेवून तारांगण …

Read More »

बकरी ईद दिवशी गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करा

बजरंग दलची मागणीखानापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांची अस्मिता असलेल्या गो मातेची हत्या इतर धर्मियांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी व असे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गोमातेचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष …

Read More »

खानापूरातून चोरट्या मार्गाने होणारी गो वाहतूक रोखा; भाजपाचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, …

Read More »

विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे …

Read More »