Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणीत ४ ठिकाणी गणेशमूर्तीसह निर्माल्याचे संकलन

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचा पुढाकार ; स्वच्छतेसह विजेची सोय निपाणी : शहर आणि उपनगरात गणेशमूर्ती आणि गौरीचे विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेसह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि विविध संघटनांच्या पुढाकारातून ४ ठिकाणी गणेशमूर्ती, गौरीचे विसर्जन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रामनगर, मराठा मंडळाजवळील हवेली तलाव आणि अंमलझरी रोडवरील तलाव …

Read More »

खानापूर तालुक्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिना 12.82 कोटीचा लाभ! पंचहमी योजना समिती अध्यक्षांची माहिती

  खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात आज मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी गॅरंटी योजना समितीची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाच गॅरंटी योजनेचे तालुका अध्यक्ष श्री. सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीत पाच गॅरंटी योजनेच्या अधिकाऱ्यांसह मान्यवर सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान विविध योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गृहलक्ष्मी …

Read More »

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात घरगुती गणेश विसर्जन

  तलाव, विहिरीवर भाविकांची गर्दी; पर्यावरणपूरक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (प्रतिनिधी) : “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या ऽऽ” अशा जयघोषात मंगळवारी (ता.२) निपाणी शहर व परिसरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साहात पार पडले. सहा दिवसांच्या पूजाअर्चेनंतर भाविकांनी श्रीगणरायाला निरोप दिला. यंदा निपाणी नगरपालिका प्रशासनासह दौलतनगर येथील दौलतराव पाटील …

Read More »

उद्या बेळगावात सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव!

  बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची वाट मोकळी झाली आहे. बेळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 …

Read More »

बेळगावात 5 रोजी जिल्हास्तरीय ‘जय गणेश श्री -2025’ शरीरसौष्ठव स्पर्धा

  बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जय गणेश श्री -2025’ किताबाच्या पहिल्या जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे भरविली जाणारी ही …

Read More »

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश; जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

  मुंबई : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सरकारने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे. जीआर निघाल्यास मुंबई सोडणार असे जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर स्पष्ट केले आहे. राधाकृष्ण …

Read More »

३ वाजेपर्यंत मैदान खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू; उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना थेट इशारा

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, 3 पर्यंत सगळं सुरळीत झाले पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला …

Read More »

वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

  कोल्हापूर : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठातर्फे वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामधील निवडक व्याख्यानांचे ‘नंदादीप’ या डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे …

Read More »

बॅ. नाथ चौक श्रींच्या मंडपात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय

  बेळगाव : शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी श्रींच्या मंडपात, खासबाग येथील क्रांती महिला मंडळाच्या भगिनींनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय बनविले. सुवर्ण …

Read More »

धर्मस्थळ यात्रा हे भाजपचे एक ढोंग : सिध्दरामय्या

  बंगळूर : धर्मस्थळात भाजप राजकारण करत आहे. धर्मस्थळाला भाजपने काढलेली यात्रा ही एक राजकीय यात्रा आहे. त्यातून त्यांना राजकीय फायदा होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. आपले मूळ गाव म्हैसूर येथील सिद्धरामनहुंडी येथे पत्रकारांशी बोलताना, धर्मस्थळ प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन झाली असताना भाजपने यात्रा का काढली नाही, हा भाजपचा अहंकार …

Read More »