धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमुळे युवकांमध्ये कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. समाजात वेगळ्या प्रकारची जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ झाला आहे, असे मत ग्रामपंचायत …
Read More »चिक्कोडी माता व बाल रुग्णालय लवकरात लवकर लोकार्पण करण्यासाठी कार्यवाही करा : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : चिक्कोडी येथे बांधण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती …
Read More »सातवा वेतन आयोग लागू न केल्यास आंदोलन
सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …
Read More »माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी
खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे …
Read More »भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या अटक प्रकरणी बेळगावात भाजपकडून निषेध
बेळगाव : बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बेंगळुरू येथे झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी म्हैसूर येथे आयोजित केलेल्या विशाल …
Read More »पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश बेळगावात नको; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन
बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. पीओपी मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग हे जलचर प्राण्यांना आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहेत. पीओपीच्या वापरामुळे निसर्ग संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी होत आहे त्यामुळे बेळगाव जिल्हा पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री, वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जीनगौडा शाळेचे सचिव कुंतीसागर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, देवेंद्र जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील. संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. …
Read More »शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन : आबासाहेब दळवी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची दखल घेऊन ज्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी …
Read More »राज्यातील १५ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
बंगळुरू : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु, शिमोगा, दावणगेरे, हसन, यादगिरी, बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, हावेरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि शिमोगा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर …
Read More »दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचे प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ केजरीवाल यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta