Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी …

Read More »

मराठा आरक्षण मिळवता येऊ शकते, पण केंद्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल : संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने काल (दि.०१) फेटाळली. आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला आहेत, असा दावा केंद्र सरकारने याचिकेद्वारे केला होता. तोच न्यायालयाने फेटाळला आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, आता केंद्राची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले, की मराठा समाजाला राज्यपाल …

Read More »

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले

नवी दिल्‍ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्‍य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?, पंकजा मुंडे यांचीही चर्चा

पुढील आठवड्यात कॅबिनेटचा विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा उर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची …

Read More »

आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून …

Read More »

झारखंड : कळपातून काढून टाकलेल्या हत्तीने १४ जणांना केले ठार

नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून …

Read More »

दहा दिवसांत बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करा!

सर्वोच्च न्यायालयाचे शाळा मंडळांना निर्देश नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. याशिवाय 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसह देशभरातील विविध शिक्षण मंडळांनी बारावीच्या परीक्षा रद्द …

Read More »

कसोटीत न्यूझीलंड ‘अजिंक्य’; टीम इंडियाचा ‘विराट’ पराभव!

साउदम्पटन – कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखत पराभव करून पहिलेवहिले कसोटी अजिंक्‍यपद आपल्या नावावर केले. सामन्यात सातत्याने पावसाच्या व्यत्ययानंतरही रंगतदार स्थितीत आलेला सामना कर्णधार केन विल्यम्सन (52) व रॉस टेलर (47) यांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडने सहज खिशात घातला. त्यापूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा …

Read More »

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला मोठा झटका! ९ हजारांपेक्षा जास्त संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

नवी दिल्ली: देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योजक विजय माल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका बसला आहे. कारण या तिघांच्याही हजारो कोटींची संपत्ती बँकांनी हस्तांतरित केली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून तब्बल 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता …

Read More »

बँक खात्याशी आधार, पॅन लिंक असेल तरच मिळणार जूनचा पगार!

बेळगाव : खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला असेल तरच त्यांना जून महिन्याचा पगार मिळणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला नसेल तर त्यांचा जून महिन्याचा पगार खात्यावर जमा …

Read More »