खानापूर : जांबोटी-खानापूर मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा मंगळवारी (ता. १८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान, धडक देणारा वाहनचालक पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सोमवारी सकाळी …
Read More »खो- खो ची विजयी झंकार, ताराराणी काॅलेजचा बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत प्रहार!
बेळगाव : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय नेहमीच अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये बेळगाव जिल्ह्यात अग्रगण्य कॉलेज राहिले आहे. अभ्यासात अव्वल स्थानी असणाऱ्या येथील विद्यार्थिनी क्रीडाक्षेत्रातही उत्तम नावलौकिक मिळवित आहेत. खानापूर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या या महाविद्यालयाच्या खो- खो पथकातील खेळाडू कु. नीलम कक्केरकर (कर्णधार), कु. लक्ष्मी हंगिरकर, …
Read More »विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते : अभिजीत उदयसिंग सरदेसाई
कारलगा हायस्कूल कारलगा येथे फिरते विज्ञान प्रयोगालय खानापूर : विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते. सृष्टीतील रहस्य उकलून मानवाच्या प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य विज्ञान करते. त्यांनी विज्ञानाचे विविध उपयोग स्पष्ट करत विज्ञान मानवी जीवनाचा उत्क्रांतीत कसा सकारात्मक बदल घडवतो, असे प्रतिपादन कायदे सल्लागार अभिजीत उदयसिंग सरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी …
Read More »म. मं. ताराराणी काॅलेजचा अभिमान, स्वाती सुनील पाटील हीचा निबंध स्पर्धेत सन्मान
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यालय नेहमीच सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक दृष्टिकोन जोपासणारे विद्यालय म्हणून समस्त खानापूर व बेळगाव जिल्ह्याच्या परिचयाचे आहे. मौजे मुगळीहाळ सरकारी कॉलेज मध्ये खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपन्न झाल्या. या अंतर्गत इंग्रजी निबंध …
Read More »तिओलीवाडा येथे वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू
खानापूर : खानापूर – लोंढा राष्ट्रीय महामार्गावर तिओली क्रॉसजवळ रविवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील तिओलीवाडा येथे रस्ता ओलांडत असताना हरणाला वाहनाची धडक बसल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे संबंधित …
Read More »मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक : खानापूर तालुका समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी
युवा स्पोर्ट्स हलशीवाडीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न खानापूर : शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी शिक्षकांबरोबरच शाळा सुधारणा कमिटीने महत्त्वाची भूमिका बजावणी गरजेचे असून इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच यशस्वी होता येते हा न्यूनगंड बाजूला ठेवून मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …
Read More »उद्या खानापूर शहरासह तालुक्यात वीजपुरवठा खंडित
खानापूर : हेस्कॉमकडून देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे रविवार, दि. १६ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत खानापूर तालुक्याचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे. नागरगाळी, भालके (केएच), शिंदोळी, सावरगाळी, आंबेवाडी, तिओली, ढोकेगाळी, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोळी, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, आंबोली, हसनवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, मनतुर्गा, शेंडगाळी, हेम्माडगा, बिडी, …
Read More »माजी विद्यार्थ्यांकडून छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूरला विज्ञान प्रयोगशाळेसाठी २३ उपकरणांची भेट
बैलूर : छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूर येथील २०१३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी तब्बल २३ अत्यावश्यक व अत्याधुनिक विज्ञान उपकरणांची भेट दिली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगाधारित शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. या भेटीत मायक्रोस्कोप, प्रोजेक्टर, मानवी सांगाडा (Human Skeleton), पचनसंस्था …
Read More »गाव व्यसनमुक्त व्हावे, खेळातून करिअर घडावे हाच मुख्य उद्देश : प्रसाद पाटील
खानापूर : बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसनमुक्त व्हाव, खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच …
Read More »लालवाडी – चापगाव आणि चापगाव – आवरोळी रस्त्याच्या दुरुस्तीस प्रारंभ
शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या मागणीला प्रतिसाद सततच्या आणि अतिरिक्त पावसामुळे लालवाडी ते चापगाव आणि चापगाव ते आवरोळी या मार्गांवरील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वाहतुकीला अडचण होत होती. या रस्त्यानेच उसाच्या ट्रकांची वाहतूक होत असते त्यालाही अडथळा निर्माण झाला होता. याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta