Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला

  पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती. नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या. आत्तापर्यंत साधारणता सर्वच …

Read More »

लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन

  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील विद्यार्थ्यांना लोंढा अरण्य विभाग व कर्नाटक सरकार यांच्या चिन्णर वनदर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय व हेमडगाव सदाहरित जंगलाला शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, लायकेन-शेवाळे, सदाहरित जंगलाची वैशिष्ट्ये व वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अभ्यास …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेली गाय ठार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाने गोठ्यात बांधलेल्या गाभनी गाईला ठार केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरकड येथील शेतकरी शिद्दु रामू खरात यांनी नेहमीप्रमाणे आपली गाभनी गाय सायंकाळी गोठ्यात बांधली होती. खेड्यांमध्ये आता पक्की घरे …

Read More »

नागेश चोरलेकर (खानापूर) हा “जयभारत क्लासिक 2025” चा मानकरी

  बेळगाव : जयभारत क्लासिक -2025 ही बेळगांव जिल्हा ग्रामीण मर्यादित व महाविद्यालयीन टॉप -10 व दिव्यांगासाठी शरिर सौष्ठव स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालयमध्ये संपन्न झाली. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, दयानंद कदम, बसंनगौडा पाटील, प्रेमनाथ नाईक, किशोर गवस, रणजित किल्लेकर, गिरीश बरबर इतर मान्यवर …

Read More »

महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन

  खानापूर : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. अशी देखील कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध बेळगाव येथे होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी …

Read More »

निवृत्त सैनिक मारहाण प्रकरणी माजी सैनिक संघटनेकडून नंदगड पोलीस स्थानकास घेराव

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील निवृत्त सैनिकावर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ वायरल होताच तालुक्यात एका संतापाची लाट उसळली. हेल्मेट नसल्याचे क्षुल्लक कारणावरून एका निवृत्त सैनिकाला चार ते पाच पोलिसांनी मारहाण करत जबरदस्तीने ओढत पोलीस ठाण्यात नेल्याची घटना नंदगड येथे नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसोबतच निवृत्त …

Read More »

आशीर्वाद हॉस्पिटल व श्री आर्थो अँड ट्रॉमा सेंटरतर्फे खानापूरात कार्यशाळा संपन्न

  खानापूर : स्टेशन रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटल सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आशीर्वाद हॉस्पिटल व श्री आर्थो आणि ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, सायकीयाट्री (मानसोपचार), त्वचारोग, दमा व छाती विकार, स्पाइन, हाडांचे रोग यांसह विविध स्पेशालिटी तज्ज्ञांकडून सेवा उपलब्ध …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत कर्नाटक राज्याच्या बेळगांव येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणार्‍याला महामेळाव्याला पाठींबा …

Read More »

निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण; नंदगड येथील घटना

  खानापूर : हेल्मेट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण केल्याची निंदनीय घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवत वयोवृद्ध निवृत्त सैनिकावर अमानुष्यवृत्ती अत्याचार केल्याची …

Read More »

हत्तीच्या कळपाचा तिवोली, गुंजीत उपद्रव; भीतीचे वातावरण

  खानापूर : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तिवोली आणि गुंजीसह आसपासच्या भागात हत्तींचा उपद्रव तीव्र झाला आहे. दररोज विविध गावांत टोळके शिरून भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असून, सुगी हंगामातच हा अनाहूत संकट शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्याची शेतकऱ्यांची धांदल …

Read More »