खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, …
Read More »खानापूर पोलिस स्थानकाकडून गुन्हेगारांना अभय : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक …
Read More »मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!
खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …
Read More »खानापूर तालुक्यातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित
खानापूर : कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे खानापूर तालुक्यात सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित राहणार आहे. 110 के. व्ही. खानापूर उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याने तालुक्यातील अनेक गाव व परिसरांना त्याचा …
Read More »हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला
खानापूर : हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हलगा आणि परिसरात अध्यक्षांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून जखमी झालेल्या सुनील पाटील यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हलगा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक …
Read More »श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे रविवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला
खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला 2025–26” चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे श्री. पी. रामाप्पा B.E.O, खानापूर …
Read More »हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा; रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
खानापूर : हलशी, हत्तरवाड, मेंढेगाळी, हलगा, कीरहलशी, मेरडा, करजगी, बस्तवाड, सुल्लेगाळी व नागरगाळी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे वाहतुकीचा मार्ग नव्हे तर “दररोज मृत्यूकडे नेणारा राजमार्ग” बनला आहे. या रस्त्यावरून दररोज खानापूर, बेळगाव, नंदगड या भागात नोकरी, व्यवसायानिमित्त शेकडो वाहन चालक ये-जा करीत असतात. …
Read More »शिस्त, जिद्द आणि संघभावनेचा उत्सव : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप
खानापूर : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल, खानापूर येथे २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा क्रीडा महोत्सव उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. स्पर्धांची सुरुवात नेत्रदीपक पथसंचलन परेडने करण्यात आली. शाळेतील …
Read More »शाळांच्या विकासासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घ्याव्यात : आबासाहेब दळवी
खानापूर : मराठी शाळांच्या विकासासाठी आणि सामान्य वर्गातून शिक्षण घेण्यासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उद्योजकांनी शाळा दत्तक घ्याव्यात आणि सरकारी मराठी शाळांच्या विकासाला हातभार लावावा, असे प्रतिपादक खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. बेळगाव येथील युवा उद्योजक महेश बिर्जे यांनी आपल्या आई-वडिलांच्या पहिल्या …
Read More »वेग, चपळता आणि जिद्दीचा संगम म्हणजे म. मं. ताराराणी पदवी पूर्व काॅलेजच्या खो -खो खेळाडूंचा आक्रमक उगम!
खानापूर : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भव्य खो-खो स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील खेळाडूंनी आपल्या वेगवान चाली, अचूक टच, धारदार चेसिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना अक्षरशः घाम फोडत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta