Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

खानापूर जंगलात उद्यापासून सुरू ‘व्याघ्रगणना’

खानापूर : बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य असून भीमगड अभयारण्य, नागरगाळी, कणकुंबी जांबोटी आदी ठिकाणच्या जंगलात लाईन ट्रांझॅक्ट मेथड (रेषा विभाजन) आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने वाघांची गणती करण्यात येणार आहे. सदर 4 वर्षातून एकदा होणारी व्याघ्रगणना उद्या शुक्रवार दि. 4 पासून सुरू होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन …

Read More »

बेकवाड- बिडी मार्गावर बर्निंग ट्रक

शाॅर्टसर्किटमुळे ट्रकचे प्रचंड नुकसान खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर यल्लापूर महामार्गावरील बेकवाड बिडी दरम्यान धावणाऱ्या ट्रकला गुरूवारी दि. ३ रोजी दुपारी अचानक आग लागल्याने ट्रक जळुन खाक झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर यल्लापूर राज्यमार्गावर बेकवाड बिडी दरम्यान केए २२ बी ४०५८ क्रमांकाचा ट्रक खानापूरहुन बिडीकडे येत होता. यावेळी …

Read More »

चापगांव हायस्कूलमध्ये सर्पमित्र उमेश अंधारे यांचे सर्पाविषयी मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) : चापगांव (ता. खानापूर) येथील मलप्रभा हायस्कूलच्या पटांगणावर सर्पमित्र उमेश अंधारे यांनी लहानपणापासून मुलाच्या मनातील सापाविषयीची भिती दुर व्हावी. तसेच विविध सापाच्या जाती व साप हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे याबद्दलही माहिती दिली. यावेळी त्यांनी यडोगा येथे पकडलेल्या विषारी नाग सर्पाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषारी आणि बिनविषारी …

Read More »

माणिकवाडीत शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडीत (ता. खानापूर) येथे पोवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधुन शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, शिवशक्ति सोसायटीचे संस्थापक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य व प्रा. शंकर गावडा, सदस्या सौ. प्रीती गोरल, माजी सैनिक महादेव …

Read More »

वीट कामगारांच्या मुलासाठी तंबू शाळेचे महत्व वाढले

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड, सिगीनकोप, अंकले, गणेबैल, निट्टूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, निडगल, बरगाव आदी भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो. या भागात वीट कामगार म्हणून यमकनमर्डी, गोकाक, हुक्केरी, हल्याळ, बेळगाव तालुक्यातील विविध गावचे नागरीक मोठ्या संख्येने नोव्हेंबर ते मार्चपर्यंत शिवारात स्थायीक होतात. हे वीट कामगार आपल्या सोबत शालेय विद्यार्थी, जनावरे, …

Read More »

चापगांवात पारायण सोहळाला उत्साहात प्रारंभ

खानापूर (वार्ता) : चापगांव (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवारी दि. 2 रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 9 वा आणि 12 ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पीडीओ शिवलिंग मारीहाळ होते. दीपप्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, …

Read More »

असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार

खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या …

Read More »

गर्लगुंजीत लक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावच्या ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराच्या इमारतीचे रंगकामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सोमवारी दि. 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …

Read More »

खानापूरात मोकाट जनावराला वाहनाची धडक

खानापूर (वार्ता) : बेळगाव-पणजी महामार्गावरील खानापूरातील आंबेडकर गार्डन जवळ मोकट जनावरे सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जनावराचे तोंड फुटून गेले. मात्र अज्ञात वाहनाने पलायन केले. ही माहिती मिळताच खानापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पशुमित्र प्रज्योत दलाल, दिपक सुतार, निलेश सडेकर, अवधूत परब, सुरज कदम, श्री पाटील, संदिप चौगुले …

Read More »

बेळगांव-पणजी महामार्गावर मराठीत फलक बसवा

युवा म. ए. समितीची मागणी खानापूर (वार्ता) : बेळगाव – पणजी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. बेळगांवपासून लोंढ्यापर्यंतचा भाग हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. या भागात 80 टक्के जनता मराठी भाषिक आहे. अशा मराठी जनतेसाठी मराठी भाषेतून फलक उभारावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने …

Read More »