Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

निपाणी, चिक्कोडीतील 7 बंधारे पाण्याखाली!

निपाणी (चिक्कोडी): गेल्या दोन दिवसांपासून चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीच्या पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १७) निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगेवरील ४ व वेदगंगेवरील ३ असे ७ बंधारे पाण्याखाली गेले …

Read More »

खानापूरात मत्स्य पालन केंद्र बंदच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी अनेक खात्याची कार्यालये असुन अनेक कार्यालये जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येक खात्याच्या कार्यालयातून जनतेच्या समस्या, विविध योजनाचा लाभ होतो. विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्कात राहून जनतेची सेवा करतात.मात्र खानापूर शहरातील असे एक कार्यालय आहे. की खात्याच्या अधिकाऱ्याची तालुक्यातील जनतेला ओळख नाही. या खात्याच्या …

Read More »

गवळीवाड्यात आमदार डॉ. निंबाळकरांनी केले साहित्याचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावापासून जवळ असलेल्या गवळीवाड्यातील कुटुंबाना खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गवळीवाड्याला नुकताच भेट देऊन गवळीवाड्यातील प्रत्येक कुटूंबाला १० किलो तादूळ व इतर साहित्याचे वाटप केले.तसेच गवळीवाड्यातील इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, …

Read More »

शनिवारी-रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार दि. १९ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी सहा …

Read More »

पहिल्याच पावसात खानापूर-जांबोटी क्राॅस रस्त्यावर पाणी

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्यावर पाणी आल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाला व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सर्वथरातून तसेच शहरवासीयातुन होत आहे.जत-जांबोटी महामार्गावर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम …

Read More »

बेळगावात विहिंप-बजरंग दलातर्फे औषधी काढ्याचे वाटप

बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम …

Read More »

डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला 21 रोजी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा …

Read More »

पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित

मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!

रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …

Read More »

कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!

प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत …

Read More »