Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

बँकेच्या माध्यमातून सक्षम उद्योजक बना

पुष्पा किशोर : एसीएसटी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन निपाणी : भारत सरकारने एससी एसटी मागासवर्गीय यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी व इंडस्ट्रियल निर्माण करून स्वत:च मालक होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील प्रयत्न करून बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन सक्षम उद्योजक बना व उद्योग द्या असे प्रतिपादन …

Read More »

नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य

मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी : ऊस वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना मार्गदर्शन निपाणी : वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, विशेष करून ऊस गळीत हंगाम काळात ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व …

Read More »

‘अरिहंत’ने शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले : संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील

अरिहंत दूध संघाकडून 5.2 लाख बोनस वाटप निपाणी : ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था देण्या बरोबरच दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. या दूध संघामार्फत गेल्या 15 वर्षापासून दूध उत्पादकांना खास दिवाळी निमित्त बोनस …

Read More »

माध्यान्ह आहारात लवकरच दुधाचे वाटप

बेंगळुरू : शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतचे वर्ग पूर्वपदावर आल्यामुळे तयार माध्यान्ह आहार वितरणास सुरुवात झाली असून लवकरच विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 23 ऑगस्टपासून नववी ते दहावी तर 6 सप्टेंबरपासून इयत्ता सहावी …

Read More »

सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

बंगळूरू : कर्नाटक सरकारने बुधवारी (ता. 27) आपल्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करून दीपावलीची भेट दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांचा डीए आता त्यांच्या मूळ वेतनाच्या 21.5 टक्क्यांवरून 24.5 टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के डीए वाढविल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढ पूर्वलक्षीपणे लागू …

Read More »

दुर्गम भागात 100 शिधापत्रिकांमागे एक रेशन दुकान

राज्य सरकारचा निर्णय : डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट बंगळूरू : कर्नाटक सरकारच्या योजनेनुसार सर्व काही चालले तर, कर्नाटकातील दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना रेशन विकत घेण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तृतीय पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण, रेशन दुकानांपर्यंत प्रवेश नसलेल्या सर्व दुर्गम भागात रास्त …

Read More »

‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा

मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण खानापूर युवा समितीतर्फे इशारा बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी खानापूर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांची भेट घेऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती व युवा समितीचा उत्स्फूर्तपणे सहभाग

बेळगाव (वार्ता) : आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. आपल्या न्याय हक्कासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळराव देसाई, गोपाळ …

Read More »

धार्मिकस्थळ संरक्षण मसूद्याला राज्यपालाची मंजूरी

अधिकार्‍यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्थगिती बंगळूरू : कर्नाटक सरकारने कर्नाटक धार्मिक संरचना (संरक्षण) कायदा अधिसूचित केला आहे, तो विधानसभेने मंजूर करून एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यावर सही केली आहे. यामुळे अचानक मंदिरे उद्ध्वस्त करणाच्या अधिकार्‍यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्वाभाविकपणे स्थगिती मिळाली आहे. हा कायदा सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या धार्मिक वास्तूंना …

Read More »