Thursday , June 4 2026
Breaking News

थार चालकाने घातली हालात्री नदी पुलावरील पाण्यातून गाडी!

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॅरिकेट्स लावून किंवा पोलीस बंदोबस्त ठेवून हा रस्ता बंद करण्याची मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

आज एका थार चालकाने आपला जीव धोक्यात घालून आपली पुलावरील पाण्यातून गाडी घातली. सुदैवाने नदी पुलावरील पाण्यातून तो सही सलामत बाहेर आला.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *