Saturday , July 27 2024
Breaking News

घोटगाळी ग्राम पंचायतीतील नरेगा कामाचा (मेट) कायक बंधु बदलु नका : ता. पं. अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या वतीने महात्मा गांधी नरेगा योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. घोटगाळी ग्राम पंचायत हद्दीतील ९ गावातील रोजगाराना महात्मा गांधी नरेगा योजनेचे काम मिळाले आहे.
मात्र घोटगाळी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी नरेगा योजनाचा (मेट) कायक बंधू बदलून रोजगार लोकावर अन्याय करत आहेत,अशी तक्रार घोटगाळीचे खेमराज गडकरी यांनी ओबीडएसमॅन जिल्हा पंचायच बेळगांव याच्याकडे केली असुन यासंदर्भात तालुका पंचायतीच्या ए, डी यांच्याकडे ही लेखी तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नकली रोजगारचे एनएमआर वापरून पंचायतीमधील निधी लाटण्याचा प्रकार असून अचानक जुना (मेट) कायक बंधू बदलून दुसरा नेमणे म्हणजे मनमानी कारभार आहे.
कोणत्या ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना (मेट) कायक बंधू बदलण्याचा अधिकार नाही. मग घोटगाळी ग्रा. पं. कर्मचारीवर्गाना हा अधिकार कोणी दिला.
घोटगाळीतील नरेगा योजनेचा (मेट) कायक बंधू बदल्यास त्याचा विरोधात आंदोलन छेडू व तालुका पंचायतीच्या अधिकारी वर्गाने त्याच्यावर कारवाई करावी.
घोटगाळी ग्रा. पं. हद्दीतील ९ गावच्या रोजगाराना न्याय द्यावा. अशा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन देताना काँग्रेसचे नेते इरफान तालिकोटी देवाराई, खेमराज गडकरी घोटगाळी, संतोष पाटील शिंदोळी, परशराम कोलेकर कोडगई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *