Saturday , July 27 2024
Breaking News

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राज्यपाल नियुक्तीचा विषय घातला मोदींच्या कानी!

Spread the love

मुंबई : राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 12 मुद्यांवर आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला.
गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या भेटीचे निमित्त साधून अजित पवार यांनी हा मुद्या सुद्धा पंतप्रधान मोदींच्या समोर मांडला.
गेल्या आठ महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारने याबद्दल यादी राज्यपालांना पाठवली आहे. राज्यात सरकार हे बहुमतात आहे. तरीही याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही. हायकोर्टात सुद्धा याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारकडून यादी राज्यपालांना दिली आहे, या आमदारांची नियुक्ती कशी करायची ही कायदेशीर बाब यात पूर्ण आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधानांसोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. स्थानिक स्वराज संस्थेच्या ओबीसी आरक्षण काढून टाकले आहे. त्यामुळे 56 हजार जागेवर परिणाम होत आहे. ओबीसीची जनगणना करावी. 50 टक्के ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणीही पवारांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढविण्यासंदर्भात महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

Spread the love  सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *