Friday , May 16 2025
Breaking News

कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार; पंतप्रधान मोदी कडाडले

Spread the love

 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. ‘हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार’, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बिहारमधील सभेत भाषण करताना त्यांनी पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांवर चांगलेच कडाडले. त्यांनी इशारा दिला की, ‘पहलगाममधील क्रूरतेने कोट्यवधी भारतीय दुखी झाले आहेत. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. या हल्लेखोरांना आता जमिनीत गाडून टाकण्याची वेळ आली आहे.’

पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दहशतवाद्यांचे कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांना कठोर शासन देणार. उरले सुरले दहशतवादी जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दोषीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांला शोधून काढून शिक्षा दिली जाईल.’ तसेच ‘हा हल्ला फक्त पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्म्यावर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल असा धडा त्यांना शिकवला जाईल. या हल्ल्यात कुणी आपला भाऊ, मुलगा, नवरा गमावला आहे. यापुढे आम्ही दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. सर्व पीडित कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश उभा आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांच्या उपचारात सरकार सहकार्य करत आहे.’, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी

Spread the love  नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *