Sunday , June 28 2026
Breaking News

70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, “या” राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी

Spread the love

 

नवी दिल्ली : देशातील विविध भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, 9 मेपर्यंत काश्मीर ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजा कोसळण्याची, वादळी वारे वाहण्याची, गारपीटीची आणि धुळीच्या वादळांची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा इशारा
दिल्ली-एनसीआरमध्ये संपूर्ण आठवडाभर हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 6 मेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होऊ शकते. या काळात 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजा पडण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीटही होण्याची शक्यता आहे.

डोंगराळ भागात बर्फवृष्टी
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या उत्तर-पश्चिमेकडील डोंगराळ राज्यांत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि उंच भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात उत्तराखंडमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये वादळाचा इशारा
पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथे 6 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. 4 आणि 5 मे रोजी 70 किमी प्रतितास वेगाचे तीव्र वादळ आणि 4 मे रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मध्ये 3 ते 7 मेदरम्यान वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी संपूर्ण राज्यात आणि 5 मे रोजी पूर्व भागात 70 किमी प्रतितास वेगाचे वादळ येण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते.

राजस्थानमध्ये धुळीचे वादळ
राजस्थान मध्ये 4 मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानात 4-7 मे आणि पूर्व राजस्थानात 4-8 मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाचे वारे वाहतील. 4 मे रोजी पूर्व राजस्थानात गारपीट होऊ शकते. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

बिहार, बंगाल आणि झारखंडमध्ये वादळ
पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे आठवडाभर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

दूधसागर नदीत चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तिघे सख्खे भाऊ

Spread the love  पणजी/कुळे : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *