संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरपासून अवघ्या किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते./संकेश्वर येथून केवळ १३ कि. मी. अंतरावर गडहिंग्लज आहे. संकेश्वर-गडहिंग्लजला दोहो गावातील बहुसंख्य लोकांचे ये-जा नेहमी सुरू असते. कोरोना महामारीमुळे संकेश्वर-गडहिंग्लजचा संपर्क तुटला होता. कारण दोन्ही आगारातून बससेवा बंद ठेवण्या आली होती. त्यामुळे संकेश्वरहून गडहिंग्लजला जाणेसाठी संकेश्वरातील प्रवाशांना हळ्ळी हिटणी तेथून गडहिंग्लज असा प्रवाश करावा लागत होता. बससेवा बंद असल्यामुळे वडापमधून प्रवाशासाठी लोकांना ४० रुपये काय प्रसंगी ५० रुपये मोजावे लागायचे. दोहो बाजूचा प्रवासाला शंभर रुपये मोजावे लागायचे. वेळ देखील दुप्पट खर्च व्हायचा. त्यामुळे संकेश्वरकर लालपरीची चातकाप्रमाणे वाट पहात होते. गेल्या आठवड्यापासून लालपरीच्या संकेश्वर-गडहिंग्लज फेऱ्या सुरु झाल्यामुळे संकेश्वरातील बहुसंख्य प्रवाशांतून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे. संकेश्वरला लालपरी धावू लागल्याने संकेश्वरातील प्रवाशांची वेळेचे आणि पैशाची बचत होताना दिसत आहे.
