Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर नदीघाट पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

  खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्‍याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक …

Read More »

कामात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई

  नूतन तहसिलदार प्रवीण कारंडे : तहसीलदार पदाचा स्वीकारला पदभार निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार येथील तालुका तहसीलदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयातील अनुभव असून त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. त्यांची …

Read More »

श्रीराम सेनेची एसडीपीआय, पीएफआयवर बंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने!

  बेळगाव : श्रीराम सेनेतर्फे एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि …

Read More »

जाधवनगरात बिबट्याचा संचार

  बेळगाव : जाधवनगरमध्ये आज बिबट्या निदर्शनास आल्याने एकच घबराट पसरली. जाधवनगर येथे गवंडी काम करत असता एकावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे समजते. सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जाधवनगर येथे अचानक एक बिबट्या प्रकट झाल्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर …

Read More »

अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल!

  बेळगाव : खानापूरसह बेळगांव तालुक्यातील हजारो विद्यार्थी बेळगांव शहरात शिक्षणासाठी ये-जा करत असतात. मात्र अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या बस आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दाराजवळ लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे त्रास लक्षात …

Read More »

गर्लगुंजीतून ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ पाटील यांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारकडून भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येत्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला गर्लगुंजी भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कर्नाटक सरकारला जाग आणावी, असे आवाहन खानापूर …

Read More »

संकेश्वर येथे “बर्निंग” कार

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी एक मारुती ओम्नी कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. बस स्थानकाजवळ येताच कारमधून धूर येत असल्याचे दिसत होते. लागलीच गाडीतील सर्व प्रवासी बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून …

Read More »

महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात …

Read More »

खानापुरात लवकरच शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा

  खानापूर (विनायक कुंभार) : लोकसंस्कृती नाट्य कला खानापूर संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत कालेकर व ढोलकी पट्टू ज्ञानेश्वर सतार यांनी औरंगाबाद येथील शाहीर अजिंक्य लिंगायत व भारुडरत्न कैं. निरंजन भाकरे यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांची भेट घेतली. सीमाभागात अनेक लोककला …

Read More »

हलशीत नागरिकांची एटीएमअभावी गैरसोय

  खानापूर (विनायक कुंभार) : भात पिकाच्या उत्पादनात अग्रेसर असणार्‍या या परिसरात एटीएमची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांची तसेच व्यापर्‍यांची फार मोठी समस्या होत असून हलशी येथे एटीएम मशीन उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव येथे एटीएम उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्कम काढण्यासाठी …

Read More »