Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

हॉटेल कामगार प्रभाकर कांबळेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा …

चंदगड तालुका हॉटेल कामगार व व्यावसायिकांकडून घेण्यात आली आढावा बैठक पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना नुकताच घडली आहे. या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील हॉटेल कामगार व व्यावसायिकांंकडून …

Read More »

हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांची राहत्या घरी आत्महत्या…

पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केली. ही दुःखद घटना घडल्याने चंदगड तालुक्यासह पुणे येथील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. गेली ४ वर्षे प्रभाकर कांबळे हे आर. के. बिर्याणी हॉटेलमध्ये …

Read More »

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन

बेळगाव (वार्ता) : विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सध्या शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना ताटकळत …

Read More »

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारांना रोखण्याकरिता भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले. बांगलादेशमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत. त्यांची संपूर्ण माहिती पुढे येत नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या जी माहिती …

Read More »

कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेस भाविकांची किरकोळ गर्दी

कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय.. चांगभलच्या गजरात येथील कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेला शुक्रवार तारीख 22 रोजी पासून सुरुवात झाली. सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आल्यावर आप्पाचीवाडी पालखी, कुरली पालखी, अश्व, छत्री सबिना खडक मंदिरात आणण्यात आला. विविध धार्मिक …

Read More »

नोव्हेंबर अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची शक्यता

नवी दिल्ली : कोरोना महारोगराईचा प्रकोप लक्षात घेता गतवर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. परंतु, यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने हिवाळी अधिवेशनाचा मार्ग सुकर झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत अधिवेशन भरवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान 20 बैठका होणार असून ख्रिस्मसच्या …

Read More »

बुडा बैठक यशस्वी न केल्यास तीव्र आंदोलन

बेळगाव : कणबर्गी निवासी योजनेच्या अंमलबजावणीसह रखडलेली विविध विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी बुडाच्या येत्या दि. 25 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीस शहराच्या दोन्ही आमदारांसह सर्व सदस्यांनी उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरातील सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्यावतीने …

Read More »

पंडित नेहरू महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान संपन्न

बेळगाव (वार्ता) : शहापूर अळवण गल्ली येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले. प्रारंभी संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी यांनी रवी साळुंखे, संजय पाटील, देमट्टी, हेल्थ इन्स्पेक्टर …

Read More »

जिल्हाधिकार्‍यांची विनंती समिती नेत्यांनी फेटाळली

25 रोजीचा मोर्चा होणारच बेळगाव (वार्ता) : कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रके देण्याबरोबरच फलकांवरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज पुनश्च जिल्हाधिकार्‍यांकडे केली. तसेच 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आजच्या बैठकीस …

Read More »

ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वाचे

गणपतराव पाटील : महालक्ष्मी संस्थेचा रौप्यमहोत्सव निपाणी (वार्ता): सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार्‍या एकमेव अशा असून सहकारी संस्थामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार मिळत आहे. कुन्नूरसारख्या ग्रामीण गावात शरदचंद्र पाठक यांनी चालवलेली महालक्ष्मी सौहार्द संस्था त्यापैकीच एक आहे. या संस्थेने केवळ सहकार तत्त्व न बाळगता सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राकडे …

Read More »