Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन …

Read More »

अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू

बेळगाव : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली. अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या …

Read More »

कॅथोलिक असोसिएशनच्यावतीने 1000 रोपांची लागवड

बेळगाव : बेळगाव कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागात 1000 रोपांची लागवड करण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे. बेळगावचे बिशप रेव्हड डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस व इतर कार्यकर्त्यांसह या सहभाग घेतला. हिंडाल्को, शहापूर स्मशानभूमी, मच्छे सेमिनरी, …

Read More »

श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे डेंग्यू, चिकुनगुनिया लसीकरण

बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या माध्यमातून समर्थ नगर येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे चिकुनगुनिया, डेंग्यूवरील होमिओपॅथिक लसीकरण करण्यात आले. सतत १४ वर्षे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रम्हदेव पूजनाने झाली. डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्याहस्ते पूजन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात …

Read More »

वेणूग्राम सायकलिंग क्लबच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी येळ्ळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं. सायकल ही एक परवडणारी वाहतूक आहे आणि ती पर्यावरणालाही धोका देत नाही. सर्वांनी सायकलचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन याचा पर्यावरणाला लाभ होईल, असा संदेश वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या …

Read More »

शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माती वाचवा आंदोलन’ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक …

Read More »

प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक : डॉ. अच्युत माने

आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण …

Read More »

राज्यातील जनतेला सुखाने जगू द्या : एच. डी. कुमारस्वामी

बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले. बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची …

Read More »

कडोली येथील लिंगायत समाजातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : कडोली येथे लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. तेंव्हा तातडीने सरकारी जमिनीमधील जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करावी, या मागणीसाठी कडोली येथील लिंगायत समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. कडोली येथे सर्व्हे क्रमांक 23/2 मधील 14 एकर 2 गुंठे, 24/2 मधील 20 एकर 10 गुंठे आणि …

Read More »

जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष मित्र संघटनेतर्फे वृक्षारोपण

बेळगाव : भारत हा एकमेव देश आहे जो निसर्गाची पूजा करतो, असे विधानसभेच्या सदस्या सबन्ना थलावार यांनी अखिल भारतीयातील बेळगाव शहरात ’वृक्ष मित्र’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले. ते म्हणाले की, या औद्योगिक युगात निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. अभाविपने देशभरात दहा लाख रोपांची मोहीम सुरू केली आहे, असे अभाविपचे राज्य …

Read More »