Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

शहरासह ग्रामीण भागात उद्या वीज खंडित

बेळगाव : हेस्कॉमकडून बेळगाव तालुक्यामध्ये तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली असल्यामुळे रविवार दि. 13 मार्च रोजी बेळगाव शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील कांही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. वडगाव विभाग वीज पुरवठा केंद्राच्या व्याप्तीतील धामणे, कुरहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंस गड, देसुर, नंदिहळ्ळी, कोंडस्कोप, हलगा, …

Read More »

चिमुकल्यांनी केले पर्यावरण प्रदूषणाचे प्रबोधन

प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी …

Read More »

कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी  स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या …

Read More »

विकास कामामुळे दलित समाजाची प्रगती

नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची …

Read More »

यमगर्णीजवळ अपघात : वाहनांचे मोठे नुकसान

एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …

Read More »

बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याचे महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

 कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज निर्गमित केले आहेत. बैलगाडी शर्यत परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत व भविष्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी …

Read More »

ग्रामीण मतदारसंघातील 3 रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ

2 कोटींचा निधी मंजूर बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 …

Read More »

संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज घुमला..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज हुताशनी पौर्णिमा होळी नजिक आल्याची आठवण करून देणारा ठरला. येत्या गुरुवारी दि. १७ रोजी होळी असल्यामुळे आज बाजारात टिमक्यांना फारशी मागणी कांही दिसली नाही. आज बाजारात टिमक्यांची जेमतेम विक्री झाल्याचे टिमकी व्यापारी राजू नार्वेकर यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले …

Read More »

मठ गल्लीत कष्टकरी महिलांच्या सन्मानाने महिला दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा …

Read More »

कर्नाटक काँग्रेसमुक्त करणे कोणालाही शक्य नाही : सतीश जारकीहोळी

बेळगाव : ५ राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला मतांचे विभाजन हेच कारण आहे. पण कर्नाटकात आम्हाला संधी आहे. काँग्रेसमुक्त कर्नाटक करणे कोणालाही शक्य नाही असा दावा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगावातील काँग्रेस भवनात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या ५ राज्यातील निवडणुकांतील दारुण पराभवावर आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. ते …

Read More »