Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले यांनी संविधानाचे महत्व सांगितले व शाळेचे शिक्षक श्री. एस. एस. गवस व श्रीमती नेत्रा यांनी …

Read More »

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले . डॉ.विनोद व्हनाळकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह …

Read More »

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना हद्दपार करा : करवेची हास्यास्पद मागणी

  बेळगाव : बेळगाव येथे कर्नाटक राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध करतात, हा निर्णय घेणाऱ्या समिती नेत्यांना बेळगाव मधून हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी करवे म्होरक्याने केली आहे. बेळगाव जिल्हा करवे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी म्हटले आहे की, बेळगाव येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र …

Read More »

निपाणीत बंगला फोडून २२ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

  बंद घराला केले लक्ष: चांदीच्या दागिन्यासह २५ हजार लंपास निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट केली. बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यासह रोख २५ हजार रुपये कंपास केले आहेत. या घटनेमुळे उपनारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजू …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा १००% निकाल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

  बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये अंतिम वर्षातल्या B.Pharmacy या अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला असून.. विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून कॉलेजचा १००% निकाल लागला आहे. कु. रोहिणी प्रभाकर पाटील हिने ८६.५४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सिमरन सुंठणकर हिने ८५.८१% …

Read More »

6 वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात 10 आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीससह शहापूर व एपीएमसी पोलिसांनी काल मंगळवारी छापे टाकून सहा विविध गुन्ह्यांमध्ये दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक ड्रॅगन चाकू आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच 11,400 रुपये रोख रक्कम जप्त केल्या आहेत. पोलीसांनी काल मंगळवारी केलेल्या कारवाईत मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोडका बाजार …

Read More »

पुढील अधिवेशनावेळी पत्रकार भवनाचे उदघाटन: मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन

  बेळगाव : बेळगाव शहरात सुसज्ज प्रेस इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९.९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात या इमारतीचे उद्घाटन होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे. मंगळवारी (२५ नोव्हेंबर) वार्ता भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांकडून …

Read More »

येळ्ळूर शिवारातील शेतकऱ्यांच्या कुपनलिकांची विद्यूत वायरी चोरी

  बेळगाव : अलिकडे शेतकऱ्यांचे जगणंच मुश्कील झालंय. एकिकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे शेतातील किमती वस्तूंच्या चोरीने शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. मागे अज्ञातानी येळ्ळूरच्या शेतकऱ्याची कुपनलिकेची वायर तोडून त्यात दगड टाकून मोठ नुकसान केलं होतं. ती पूर्ववत करायला सुमारे लाखभर खर्च आला. काल रात्री पुन्हा येळ्ळूर शिवारातील श्रीधर …

Read More »

ग्रामीण टेनिस बॉल ‘चेअरमन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे निपाणी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने हिमांशू उर्फ शशांक पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी (ता.२६) उद्घाटन करण्यात आले. स्वप्निल पावले यांनी स्वागत केले. येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित उद्घाटन प्रसंगी सहकाररत्न डॉ. …

Read More »

लंपी आणि लाळ्या खुरकत रोगाचे तालुक्यातील शिल्लक लसीकरण पूर्ण करा; पशुवैद्यकीय उपसंचालकांना निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्याचे कळप आपल्या खानापूर तालुक्यात येत असतात, लाळ्या खुरकतचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात त्यामुळे उपाय योजना करावी, लंपी सुद्धा पूर्णपणे प्रतिबंधित नाही त्यामुळे गाई, बैलामध्ये याचे परिणाम जास्त आढळतात. …

Read More »