बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकासकामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे तिन्ही नाले पिरनवाडी येथे जोडण्यात आले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरनवाडी याठिकाणी येऊन पिरनवाडी …
Read More »मुसळधार पावसाने खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटर पाण्याने वेढले
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून तालुक्यासह खानापूरात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे मलप्रभा नदीला पूर आला. मलप्रभा नदीच्या काठी असलेल्या खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटरला मलप्रभा नदीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे ट्रेनिग सेंटरमधील लोकाना, कुटुंबाना पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाना पाचारण करण्यात आले व बोटीच्या सहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात …
Read More »खानापूरात ७५वा स्वातंत्र्यदिन कोविडचे नियम पाळुन साजरा करू
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे साजरा होणारा राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन खानापूरात साजरा होईल, खरोखर यंदाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात हवा होता. मात्र देशभर कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला. त्यामुळे कोविड १९ चे नियम पाळून यंदाचा १७ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करायचे आहे. ठीक ९ वाजता तहसील …
Read More »बेकवाड ग्रा.पं.वतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बकेट वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत वतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनासाठी बकेटचे वितरण करण्यात आले.भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये शेड बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च करण्यात …
Read More »खानापूरात कृषी खात्याच्या अभियानाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या प्रत्येक सवलतीचा लाभ वेळेत घेऊन प्रगती साधली पाहिजे. बी बियाणे, खते, आवजारे आदींचा वेळेत उपयोग झाला तर शेतकरीवर्गाची प्रगती नक्कीच होईल, असे मत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोमवारी कृषी खात्याच्या अभियान प्रारंभी वेळी व्यक्त केले. खानापूरात सालाबादप्रमाणे यंदाही कृषी खात्याच्यावतीने कृषी खाते शेतकऱ्याच्या …
Read More »येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार
संध्याकाळी होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले …
Read More »पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता
कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा गोंधळ
नड्डांच्या वक्तव्यामुळे येडियुराप्पांच्या ‘सेफ’ची चर्चा बंगळूर : एकिकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची क्षणगणना सुरू असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात बोलताना येडियुराप्पा यांच्या कार्याचे कौतुक करून नेतृत्व बदलाचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येडियुराप्पा जाणार कि राहणार? याविषयीचे गुढ कायम आहे. रविवारी (ता. …
Read More »वाह रें पठ्या ….. पुरावर स्वार होऊन केला १३ गावांचा विजपुरवठा सुरळीत
नेसरी येथील हर्षची कामगिरी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत …
Read More »बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनात कवींची काव्य मैफिल रंगली बाहरदार …
बेळगाव : आपली काव्यरचना सादर करून त्यांनी सर्व कवीना दर्जेदार कविता लिहिण्याचे आव्हानेही केले. काव्य हे समाजमनाचे, वास्तवाचे, वेदनांचे, दुखांचे, आनंदाचे असते. त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर ती व्यतीत केल्या पाहिजेत एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजेत आणि कविला भावविश्व साकारता आले पाहिजेत. असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta