Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

आमदारांच्या जाहीर वक्तव्यांची कॉंग्रेस श्रेष्ठीनी घेतली गंभीर दखल

  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध स्वपक्षाच्या आमदारांच्या सार्वजनिक नाराजीला हायकमांडने गांभीर्याने घेतले आहे. आमदारानी पक्षाविरुध्द उघडपणे बोलू नये, मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाच्या चौकटीत आपले प्रश्न राज्यातील पातळीवर सोडवावेत, असा संदेश हायकमांडने दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आणि आज दिल्लीत त्यांच्या वरिष्ठांना भेटून …

Read More »

थार चालकाने घातली हालात्री नदी पुलावरील पाण्यातून गाडी!

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष …

Read More »

गुलबर्गा येथील तिघांची निर्घृण हत्या; जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

  बंगळूर : गुलबर्गा शहराच्या बाहेरील पाटणा गावाजवळील एका ढाब्यामध्ये पहाटेच्या सुमारास तीन जणांची घातक शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. ढाब्याचे मालक सिद्धारुध (वय ३२), जगदीश (वय २५) आणि रामचंद्र (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा ११.३० वाजताच्या सुमारास सुमारे ८-१० हल्लेखोर ढाब्यात …

Read More »

रिक्षा भाडे मागितल्याने चालकावर गुंडांचा हल्ला!

  बेळगाव : बेळगावच्या समर्थ नगरमध्ये रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली आहे. बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थ नगरपर्यंत सोडण्यास सांगितलेल्या रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि …

Read More »

कुसमळी पुलाची पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी!

  खानापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे निर्माण करण्यात येत असणाऱ्या पुलाची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बेळगाव- जांबोटी मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता करण्यात आला होता. मात्र सध्या …

Read More »

बेळगाव, खानापूर, कित्तूर तालुक्यातील शाळांना उद्या पुन्हा सुट्टी

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि अंगणवाड्यांना उद्या पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारी 25 जून रोजी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या गुरूवार …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी दुपारी दोन वाजता हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर …

Read More »

अतिवृष्टीमुळे आनंद नगर दुसरा क्रॉस येथे तलाव सदृश्य परिस्थिती…

  बेळगाव : मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आनंद नगर दुसरा क्रॉस येथे तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे नागरिकांना ये- जा करणे अवघड झाले आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे पायी चालत जाणाऱ्यांना तसेच दुचाकीस्वारांना ये- जा करणे कठीण बनले आहे. …

Read More »

कर्नाटक राज्य सरकार “इंदिरा आहार किट” योजना राबवणार!

  बेळगाव : राज्यातील बीपीएल धारकांना “इंदिरा आहार किट”चे वाटप करण्याचा कर्नाटक राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. सध्या दरमहा केंद्र सरकारकडून पाच किलो व राज्य सरकारकडून पाच किलो असे प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे परंतु बीपीएल धारकांना वाटप करण्यात येणारा तांदूळ हा आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने तांदळाचा …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टजवळ अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टजवळ एका अस्वलाने जनावरे चारायला घेऊन गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, दशरथ वरंडीकर (६०) नामक व्यक्ती आज बुधवारी पहाटे आपली जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा …

Read More »