खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे.
त्यामुळे असोगा रस्त्यावर भुयारी रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्याच प्रमाणे रुमेवाडी गावासाठी ये-जा करण्यासाठी रेल्वे मार्गावरील रस्त्यावर भुयारी रस्त्याची मागणी नुकताच रेल्वे अभियंते शशिधर यांनी खानापूराला भेट दिली. त्यावेळी रूमेवाडी ग्रामस्थांनी मागणी केली.
यावेळी भाजपचे जिल्ह्य उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष प्रमोद कोचेरी, शहर अध्यक्ष राजेंद्र रायका, धनश्री सरदेसाई, गुंडू तोपिनकट्टी, ऍड. चेतन मणेरीकर व इतर भाजप नेत्यांनी समस्याबद्दल चर्चा केली.
रूमेवाडी गावाला भुयारी रस्ता झाला तर मोठी समस्या सुटणार आहे.
