Sunday , September 20 2026
Breaking News

पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हलशी-मडवाळ रस्ता तुटण्याचा संभव

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : यंदा खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली. असाच प्रकार खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावर झालेला आहे.
याबाबतची माहिती अशी की, हलशी- मडवाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल हा माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून ८६ लाख रूपये खर्चून उभारण्यात आला आहे.
मात्र पांढऱ्या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलाजवळील रस्त्याचा भराव तुटत जात आहे.
त्यामुळे रस्त्याचा धोका वाढला असुन भविष्यात रस्ता वाहुन जाण्याचा संभव आहे. त्यामुळे या भागातून जवळपास १० ते १२ गावाचा संपर्क तुटणार आहे.
पांढऱ्या नदीच्या प्रवाहामुळे रस्त्याचा भराव खचून जाऊनये यासाठी दगडी बांधकाम होणे गरजेेच आहे. तरच रस्ता टिकणार आहे. पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन जाण्याची भिती निर्माण झाली आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

  • प्रतिक्रिया
    मडवाळ- हलशी रस्त्यावरील पूल लगत पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावरील भराव तुटत आहे. जर असाच भराव तुटत गेला तर रस्ता वाहून जाणार यासाठी दगडी बांधकाम व काँक्रीट करून रस्त्याचा भराव मजबूत करावा अन्यथा एखाद्यावेळी रस्ता वाहून गेला तर १२ गावाचा संपर्क कायमचा तुटणार. – बाबासाहेब देसाई, मडवाळ, भाजप नेते

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *