नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. ‘आप’साठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.