
चेन्नई : तामिळनाडूच्या वलपराई येथे झालेल्या एका रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. एका हेअरपिन वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने तो घसरून दरीत कोसळला, तेव्हा हा अपघात घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे वाहन केरळमधील पेरिंथलमन्ना येथील 13 पर्यटकांना घेऊन वलपराईहून परत येत होते. 13 व्या हेअरपिन वळणावर वाहनाचा तोल गेला आणि ते 9 व्या हेअरपिन वळणावर घसरले. या अपघातात एक पुरुष आणि आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णवाहिकेने वाचवून पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta