Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

  सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला …

Read More »

कौंदलात उद्या श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा

  खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही शनिवारी दि. ५ रोजी श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त विविध विधीवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री माऊली देवीची गावांतून वाजत गाजत मिरवणूक त्यानंतर दुपारी १ तेे ३ पर्यंत …

Read More »

चंदन होसूर येथे रविवारी भरतेश आदर्श ग्रामसेवा कार्यक्रम

  बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या डायमंड ज्युबिली सेलिब्रेशनच्या निमित्ताने वर्षभर अर्थपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जात आहे. संपूर्ण सामाजिक आर्थिक विकासाच्या उद्देशाने ट्रस्टने चंदन होसूर, हलगा जवळ, बेळगाव हे गाव दत्तक घेतले आहे, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती इत्यादींचा समावेश आहे. भरतेश …

Read More »

मध्य प्रदेशमधील भीषण अपघातात महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

  भोपाळ : मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी …

Read More »

सुख, समाधान, कल्याणासाठी सिद्धचक्र आराधना विधान

युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत परिवाराकडून विधानाचे आयोजन निपाणी (वार्ता) : धावपळीच्या युगात प्रत्येकांना अध्यात्म आणि सुख समाधान पाहिजे. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन साधू मुनींनी  त्याग केले आहे. त्यांनी केलेले त्याग हे समस्त मानव जातीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आचारविचारातून प्रत्येक श्रावक अध्यात्मकडे वळत आहे. अध्यात्म बरोबरच श्रावक श्राविकांना …

Read More »

काँग्रेसचे माजी नेते, माजी नोकरशहा भाजपमध्ये दाखल

  बंगळूर : काँग्रेसचे माजी नेते एस. पी. मुद्देहनुमगौडा, अभिनेते-राजकारणी शशी कुमार आणि निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कुमार बी. एच. यांनी गुरुवारी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत येथील राज्य मुख्यालयात त्यांनी भाजपात प्रवेश केला. वरिष्ठ नेते आणि तुमकुरुचे माजी …

Read More »

शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ध्यानधारणा अनिवार्य

  बंगळूर : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना १० मिनिटे ध्यान करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना …

Read More »

अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

 कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. यावेळी आमदार ऋतुराज …

Read More »

अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच …

Read More »

खेमेवाडी गाव पंधरा दिवसापासून अंधारात; हेस्काॅमचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) गाव पणजी- बेळगांव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र खेमेवाडी गावाला गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावाच्या नागरिकांची दिवाळी अंधारात गेली. अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे. त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे …

Read More »