Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

वीरशैव महासभेचे लिंगायत महासभेत रूपांतर करण्यास विरोध

बेळगाव : अखिल भारतीय वीरशैव महासभेचे नाव अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा असे करण्यामुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत असून अखिल भारतीय जागतिक लिंगायत महासभा याला विरोध करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी व्यक्त केली. बेळगावमधील विश्वगुरू कॉम्प्लेक्स मधील जागतिक लिंगायत महासभेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

एसएसएलसी : बेळगाव जिल्हा राज्यात चौथा

6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण बेळगाव : राज्यभरात घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे. बेळगाव जिल्ह्यात 6 विद्यार्थ्यानी 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. निकालात बेळगाव जिल्हा राज्यात चौथा आला आहे. …

Read More »

दहावीच्या परीक्षेत बेळगावचा हेरवाडकर स्कूलचा विद्यार्थी अमोघ कौशिक राज्यात प्रथम

बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी (दहावीच्या) परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ नागसुरेश कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक 100% गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबर राज्यात प्रथम आला आहे. शहरातील टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण संपादन केल्याने यंदाच्या दहावीच्या …

Read More »

संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी

खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …

Read More »

नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! वृद्धाच्या हत्येप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू  यांना यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हल्ल्यात त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिद्धू यांना आता पंजाब पोलिसांकडून कधीही अटक …

Read More »

दहावी परीक्षेत सहना रायर राज्यात टॉप

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या एकीत खोडा घालणारे हे कोण?

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळच्या 2018 मधील …

Read More »

ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, साध्वी कांचनगिरी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौर्‍यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा

नागपूर : राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न …

Read More »

सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण

नवी दिल्ली : देशभरात महागाईनं जोर धरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, …

Read More »