गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज-आजरा मार्गावर चालत्या दुचाकीवरच झाड कोसळल्याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …
Read More »मासेमारीस गेलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
बेळगाव : मासेमारीसाठी गेलेल्या एका मुलाचा जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिनीतील विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना अनगोळ तलावाच्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नांव विकास संजू मोघेरा (वय 14 वर्षे, रा. अनगोळ) असे आहे. विकास हा आज सकाळी अनगोळ येथील तलावाच्या ठिकाणी मासे …
Read More »चंदगड तालुक्यात संततधार
बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार …
Read More »राज्यातील नेतृत्वात बदल होणार नाही : रमेश जारकीहोळी
बेळगाव : राज्यातील नेतृत्व बदल होणार नाही, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असून 18 तारखेनंतर जनतेला नवे येडियुराप्पा दिसतील, असे वक्तव्य गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.गोकाक येथे खासदार मंगला अंगडी यांच्या कन्या श्रद्धा शेट्टर यांनी आज गुरुवारी आशा कार्यकर्त्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले. या कार्यक्रमात …
Read More »खानापूर दुष्काळ निवारण बैठकीला अधिकारी गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे देशभर हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षभरात सामान्य माणसाला जीवन जगणे मुष्किल झाले. अशातच नविन संकाटाला तोंड देण्यासाठी पावसाळी दुष्काळ निवारण समितीची बैठक खानापूर तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या. बैठकीत यंदाच्या पावसाळी हंगामात होणाऱ्या दुष्काळी निवारणासाठी पूर्व कल्पना देण्यासाठी चर्चा करण्यात …
Read More »कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर
कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिराच्या पुजारी निवासाचे बांधकाम
बेळगाव : ‘ज्या संस्थांमध्ये कारभार पारदर्शक असतो अशा संस्थांना सहकार्य करण्यास नेहमीच लोक पुढे येतात. अशा संस्थापैकी घुमटमाळ मारुती मंदिर ही एक संस्था आहे’ असे उदगार श्री. नारायण शट्टूप्पा पाटील यांनी बोलताना काढले. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी …
Read More »खानापूर – जांबोटी मार्गावर धोकादायक वृक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मारूती मंदिरजवळ रस्त्याला लागुन धोकादायक वृक्ष उभा आहे. या वृक्षामुळे अपघात होण्याचा संभव आहे.नुकताच जत- जांबोटी महामार्गावरील डांबरीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आल्याने वृक्ष रस्त्याला लागुन हा वृक्ष वाहनधारकांना धोक्याचा झाला आहे. रात्रीअपरात्री वाहन वेगाने …
Read More »खानापूरात संततधार पाऊस, कणकुबीत सर्वात जास्त
खानापूर (प्रतिनिधी) : मान्सुन अगमनाला सुरूवात होताच गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबी येथे सर्वात जास्त २०६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्याच्या इतर भागात म्हणजे जांबोटी १६६ मि. मी, लोंढा पी …
Read More »बेळगावच्या हेल्प फॉर नीडीला चक्क ऑस्ट्रेलियातून मदत!
बेळगाव : शहरातील हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडी या सेवाभावी संघटनांचे संकटमय कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनय राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय हे बेळगावातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. राजेंद्र सी. मठद यांचे चिरंजीव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta