म्हैसूर : सध्या राज्यभर सुरु असलेल्या आयटी धाडीसंदर्भात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शंका उपस्थित केली असून आयटी धाड टाकण्यामागे राजकीय हेतू असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. म्हैसूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी सिद्धरामय्यांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना बी. एस. येडियुराप्पा यांचे आप्तस्वकीय विजयेंद्र यांच्यावरील आयटी विभागाच्या कारवाईसंदर्भात संशय व्यक्त केला …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीपदी रितू राज अवस्थी
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून रितू राज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 13 राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर सही केली. केंद्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आज हे अधिसूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केल्यानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. अलाहाबादस्थित न्यायमूर्ती …
Read More »भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या इमारतीसाठी ‘अरिहंत’तर्फे 5 लाख रुपये!
सहकाररत्न रावसाहेब पाटील : नूतन वास्तू उभारणी सभेत घोषणा निपाणी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगाव येथील सहकाररत्न आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेबपाटील (दादा) यांनी या इमारतीसाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा …
Read More »विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू
निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …
Read More »माझ्याच नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण बंगळूरू : येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ते सुशासनासह भाजपला दुसर्यांदा सत्तेवर आणतील. दिल्लीत एका खासगी वृत्त संस्थेच्या संमेलनात भाग घेऊन बोलताना ते …
Read More »खानापूर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन
बेळगांव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर येथे पार पडले. उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन पुजा केली. अभिलाष देसाई यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »खानापूर युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवारी वन खात्याला निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वन खात्याच्या अधिकार्यांना खानापूर येथे निवेद देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने …
Read More »पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते सी. डी. पाटील सेवानिवृत्त
विविध ठिकाणी काम : शासनाच्या कोट्यावधी निधीची केली बचत बंगळुरू: कर्नाटक- महाराष्ट्र पूरपरिस्थिती नियंत्रणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या सहा आंतरराज्य मंत्र्यांबरोबर चर्चा करताना सी. डी. पाटील यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी. निपाणी : हिरण्यकेशी, मार्कंडेय प्रकल्प, दूधगंगा प्रकल्प, रायबाग जी. एल. बी. सी. उपविभाग, पीडब्ल्यूडी, लघुपाटबंधारे अशा विविध विभागात सहाय्यक …
Read More »अखेर भक्तांना देव पावला!
भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने मंदिरे खुली : पर्यटनही येणार पूर्वपदावर निपाणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी सरकारने गेल्या 17 महिन्यांपासून मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेशबंदी केली होती. ही प्रवेशबंदी पूर्ण क्षमतेने उठविण्यात आल्यामुळे चिकोडी तालुक्यातील मंदिरांमधील देवाला भेटण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या विरहाला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने …
Read More »हक्कासाठी शेतकर्यांची एकजूट आवश्यक
राजू पोवार : रयत संघटनेच्या जैनवाडी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta