भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार?
नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोठं पाऊल उचलणार असे तर्क लावले जात होते. तसंच ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. आता अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने काँग्रेसला मोठा हादरा बसला असून अमरिंदर सिंग हे आता भाजपच्या वाटेवर असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्यात 45 मिनिटं बैठक चालली.
अमित शहांच्या निवासस्थानी अमरिंदर सिंग शहांमध्ये पाऊण तास बैठक चालली. या बैठकीवेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते, असं बोललं जातंय. या बैठकीत काय चर्चा झाली? याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही. पण उद्या दि. ÷30 रोजी काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. अमरिंदर सिंग यांनी आज अमित शहांची भेट घेतल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अमित शहांसोबतच्या 45 मिनिटांच्या बैठकीत अमरिंदर सिंग भाजपचा पाठिंबा मागितला. तसंच शेतकर्यांचे प्रश्न आणि पंजाबमधील सुरक्षेवर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अमरिंदर सिंगांच्या माध्यम सल्लागारांचे ट्विट
अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिल्लीत भेटले. केंद्राच्या सुधारीत कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावर चर्चा झाली. तसंच हे कायदे मागे घेण्याचं आवाहन करत त्यांनी किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) हमी देण्याची मागणी केली, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कृषी कायदे मागे घेतल्यास अमरिंदर यांचा मार्ग मोकळा होणार
अमरिंदर सिंग यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर आता वेगवेगळे तर्क लावले जात असून चर्चा सुरू आहेत. सुधारीत कृषी कायदे हे अमरिंदर सिंग यांचे टास्क असू शकते. कृषी कायद्यांसंबधी अमरिंदर सिंग हे आंदोलन करणार्या शेतकर्यांना भेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चामधील मध्यस्थ म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जात आहे. अमरिंदर सिंह हे काम आधी करणार की केंद्री कृषीमंत्री झाल्यावर, यावर आता चर्चा सुरू आहेत.
अमरिंदर सिंग हे शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री असताना शेतकरी आंदोनल शांततेत सुरू होते. यानंतर शेतकर्यांनी दिल्लीवर धडक दिली. अमरिंदर सिंग यांनी त्यांना रोखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. शेतकर्यांना रोखण्याचे केंद्र सरकारेच निर्देशही त्यांनी फेटाळून लावले होते. शेतकर्यांसोबत अमरिंदर सिंग यांचे संबंध चांगले आहेत. शेतकर्यांच्या आंदोलनानंतर अमरिंदर सिंग यांनी ऊसाचे दरही वाढवले होते.
Check Also
गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’
Spread the love मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …