Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण!

Spread the love

 

निपाणी : निपाणी शहराला गेल्या चार दिवसापासून केला जाणारा पाणीपुरवठा हा हिरवा, पिवळा रंगाचा, घाणेरडा वास असे अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना घसा दुखणे, जुलाब लागणे तर काही नागरिकांना अंगाला खाज, पुरळ उठणेचा त्रास होत असुन या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक लोक आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जात आहेत. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जैन इरिगेशन कि निपाणी नगरपालिकेची हेच समजत नाही. जरी जबाबदारी कोणाचीही असुदे पण ज्या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांनी तरी ही जबाबदारी कर्तव्य म्हणून अंगावर घेतली पाहिजे, असे नागरिकांना वाटते. शुध्द पाणी पुरवठा, पुरविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. त्यावर अंकुश हा नगरपालिकेचा हवा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *