Friday , April 24 2026
Breaking News

निपाणीत अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण!

Spread the love

 

निपाणी : निपाणी शहराला गेल्या चार दिवसापासून केला जाणारा पाणीपुरवठा हा हिरवा, पिवळा रंगाचा, घाणेरडा वास असे अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना घसा दुखणे, जुलाब लागणे तर काही नागरिकांना अंगाला खाज, पुरळ उठणेचा त्रास होत असुन या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक लोक आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जात आहेत. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जैन इरिगेशन कि निपाणी नगरपालिकेची हेच समजत नाही. जरी जबाबदारी कोणाचीही असुदे पण ज्या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांनी तरी ही जबाबदारी कर्तव्य म्हणून अंगावर घेतली पाहिजे, असे नागरिकांना वाटते. शुध्द पाणी पुरवठा, पुरविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. त्यावर अंकुश हा नगरपालिकेचा हवा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढत्या उन्हामुळे मंदावली गुरुवारी आठवडी बाजारातील ग्राहकांची वर्दळ

Spread the love  निपाणी ‌(वार्ता) : आठवड्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे येथे गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *