
निपाणी (वार्ता) : मनुष्यबळाची कमतरता, शेतातील कामे वेळेत उरकण्यासाठी यंत्रांची मागणी वाढत आहे. यांत्रिकीकरण युगातही सर्जा-राजाची खिलार जोडीचे महत्त्व आजही निपाणी ग्रामीण भागात टिकून आहे. गावोगावी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच अनमोल अशी पशुसंपदा शिल्लक आहे. खर्च परवडेना तरीही हौसेखातर तर काही ठिकाणी ग्रामीणमध्ये भागातील शेतीसाठी आजही पेरणी व इतर कामासाठी बैलांचा वापर केला जात आहे.
अलीकडच्या काळात बैलजोडी सांभाळणे खूप खर्चिक झाले आहे. वाढते पशुखाद्याचे दर आणि पालनासाठी गुंतणारा माणूस याचा खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने बैलजोड्या कमी झाल्या आहेत. शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्नत्यामुळे गावोगावी पडीक जमिनी मोठ्या प्रमाणात राहात आहेत. काही शेतकरी लाखो रुपये खर्चुन बैलजोडी सांभाळत आपल्या जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे घरच्या बैलजोडीची परंपरा खूप वर्षांपासून आहे. सध्या बैलजोडी सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. यंत्राणे शेती होत असली, तरी ग्रामीण भागात बैलांशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया अंमलझरी येथील युवा शेतकरी सचिन कौंदाडे यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta