Sunday , June 14 2026
Breaking News

अंकलेची पाणी समस्या सुटली : रमेश कत्ती

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले ग्रामपंचायतची पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न फलदायी ठरल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले गाडगी गल्लीतील श्री गणेश जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अंकलेकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे. दररोज हिडकल डॅम येथून थेट अंकलेला पाच लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आता नो पाणी टंचाई म्हणावी लागेल. अंकले ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकले ग्रामपंचायत अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी भूषविले होते. यावेळी अंकले ग्रामपंचायत उपाध्यक्षा श्रीमती अनिता आजरेकर, सदस्य भरत पुंडे, ईश्वर कोणकेरी, ईश्वर बाडकर, विश्वनाथ पाटील, गंगव्वा खातेदार, सुजाता गस्ती, ॲड. जी. आर. पाटील, कुमार किंवडा, आंगद जरळी, शशीकांत सुर्यवंशी, मंजू कोनेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तब्बल 30 वर्षानंतर शाळेच्या उंबरठ्यावर….

Spread the love  उत्तूर : जी मुले हाफ खाकी चड्डी आणि सफेद रंगाचे शर्ट, डोक्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *