बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सीमाभागातील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तथा म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगली भेटीवेळी सत्कार करण्यात आला. डिसेंबर महिण्यात म. ए. समितीच्या वतीने महावेळाव्याचे आयोजन …
Read More »प्रभाग क्रमांक 6 मध्ये समस्यांचे रडगाणे
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ६ मधील समस्या निवारण सभेत प्रभागातील नागरिकांनी अनेक समस्यांचे रडगाणे सादर केले. सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, उपतहसीलदार आर. एस. बडचीकर, नगरसेवक सचिन भोपळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत लोकांनी वेंकटेश नगर मधील रस्ता निर्माण कामांचा विषय उचलून तरला. दोन …
Read More »जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन
बेळगाव : “आरोग्य हीच खरी धनसंपदा” शालेय वयातच मुलांना आरोग्याचे महत्व, आरोग्य विषयक समस्या व उपाय याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा …
Read More »सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तडीपार करा
बेळगाव : चित्रदुर्ग पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक कर्मचारी संघ, ग्रामविकास आणि पंचायत तसेच कर्मचारी संघाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे तालुक्यातील कार्यकारी अधिकारी मडगीन बसाप्पा यांच्यावर दि. १४ फेब्रुवारी रोजी तालुका पंचायत कार्यालयात काहींनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करत हल्ला केला. या दुष्कर्म्यांना …
Read More »तणावमुक्त राहून दहावी परीक्षेस सामोरे जा : युवा नेते उत्तम पाटील
बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या …
Read More »उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …
Read More »शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या स्थायी कमिटीची बैठक गुरुवारी दि. १७ रोजी नगरपंचायतींच्या सभागृहात पार पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. यावेळी प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण
पंतप्रधान मोदी करणार ठाणे-दिवा स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे ते दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे (पाचवी आणि सहावी) लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे …
Read More »महारक्तदान शिबीरनिमित्त नियोजन बैठक संपन्न
माणगांव (नरेश पाटील) : शिवजयंती निमित्त शनिवारी दि. 19 रोजी महारक्तदान शिबीरचे आयोजन माणगांव तालुका पत्रकार संघ तसेच इतर संलग्न यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. ही शिबीर सरलादेवी मंगल कार्यालयात सकाळी 10:00 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजन करण्यात आली आहे. या शिबीरासाठी के.ई.एम. रुग्णालय परळ मुंबई यांचा विशेष सहकार्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta