खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, …
Read More »तालुका आरोग्याधिकार्यांच्या निषेधार्थ बेळगावात निदर्शने
बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. …
Read More »पुजार्यांना सहावा वेतन आयोग आणि आरोग्य विमा मिळणार : मंत्री शशिकला जोल्ले
हुक्केरी : धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या मंदिराच्या पुजार्यांना तसेच कर्मचार्यांना आरोग्य विमा सुरक्षा आणि सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात धर्मादाय तसेच हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच घोषणा केली होती. या घोषणेसंदर्भात अधिकृत माहिती आज हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सवात त्यांनी दिली आहे. हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवांतर्गत रंगायन नाटकोत्सवाचे …
Read More »आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनीतील कामाचा शुभारंभ
समाज कल्याण विभागातून निधी मंजूर बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आमदार …
Read More »कोविडचे संकट दूर करून राज्याला सुबत्ता देण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आई महालक्ष्मीला प्रार्थना!
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा कोल्हापूर (जिमाका) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान …
Read More »शोषितांच्या जगण्याला बळ देऊया
प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्या व्यवस्थेत खर्या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ …
Read More »चोरटा गजाआड : 11 मोटरसायकली जप्त
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि …
Read More »कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू
बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल …
Read More »महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या
कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, …
Read More »बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!
राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta