Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

“त्या” शिक्षिकेकडून दिलगिरी व्यक्त!

बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभा करून शिक्षा दिलेल्या “त्या” शिक्षिकेने आज झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. सदर प्रकरण भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची निवड

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर, तर व्हाईस चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची एकमताने निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर निवड अडीच वर्षांसाठी करण्यात आली आहे. याचबरोबर संचालक म्हणून श्री. प्रकाश अष्टेकर, …

Read More »

माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांचा आज अमृतमहोत्सव सोहळा!

  बेळगाव : माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव यांनी सामाजिक सहकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन आज दि. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. बेळगाव येथील मराठा मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री …

Read More »

अंजली निंबाळकर यांनी घेतला उत्तराखंडमधील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा आढावा

  खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला. यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा …

Read More »

खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या : खा. जगदीश शेट्टर

  बेळगाव : न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव ए.पी.एम.सी.च्या सचिवांना दिले. परवाना रद्द झालेल्या ‘जय किसान’ भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी बेळगाव ए.पी.एम.सी.मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जागा, …

Read More »

कावळेवाडीत भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी

    कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय तर्फे थोर वैज्ञानिक राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.बी. देसाई उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन बिजगर्णी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मनोहर …

Read More »

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. निवृत्त नौसेना लेफ्टनंट शिवानंद शानभाग (विशेष सेवा मेडल) व विनोद देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अक्षता …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या 4 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. 14 वर्षाखालील राजू दोडमनी यांने 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षाखालील कैलास आर टी याने 65 किलो वजन गटात गिरको रोमण …

Read More »

पथ संंचलनात भाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षा

  बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भाग घेतल्याबद्दल वर्गाबाहेर उभा करून शिक्षा देण्यात आली. याबद्दल शहरात संतापाची लाट उसळली आहे. कॅम्प मधील नावाजलेल्या या शाळेत सोमवारी शाळेच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांचा फेसबुक वरील व्हिडिओ आणि …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »