Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

थंडी, पोषक वातावरणामुळे आंबा मोहोरला

  निपाणी भागातील चित्र; आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत निपाणी(वार्ता) : निपाणी भागात मे महिन्यापासून पंधराड्यापासून सलग पाच महिने पाऊस झाल्याने चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. महिन्यापासून आजअखेर बोचरी थंडी वाढत आहे. परिणामी आंब्याची झाडे मोहोरांनी बहरायला लागली आहेत. रब्बीतील पिकांनाही चांगला दिलासा मिळाला आहे. सध्याआंबा बागायतदारांत समाधानकारक वातावरण असल्याचे …

Read More »

पौष पौर्णिमेला अनुभवला ‘सुपर मून’चा नजारा

  पिठूर चांदणं, उल्कांची आतषबाजी; खगोल प्रेमींना ठरली पर्वणी निपाणी(वार्ता) : नववर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींसाठी ट्रिपल धमाका लॉटरी लागावी, तसा खगोलीय योग शनिवारी (ता.३) जुळून आला. थंडीचा महिना, पौष पौर्णिमेच्या मोठ्या चंद्रबिंबाचं (सुपर मून) पिठूर चांदणं, त्यात उल्कांची आतषबाजी, असा अवकाशीय नजारा पाहायला मिळाला. शशी-सूर्याच्या सान्निध्यात वसुंधरेवर काही प्रमाणात उल्कांचा पुष्पवर्षावही …

Read More »

बसस्थानकात स्वच्छतागृह, पार्किंगसाठी लूट होत असल्याची मानवाधिकार संघटनेची तक्रार

  निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानक आवारात असलेल्या स्वच्छतागृहासह दुचाकी पार्किंगसाठी संबंधित कंत्राटदार प्रवासी व नागरिकांची लूट करत असल्याची तक्रार येथील ४ जे आर मानवाधिकार संघटनेने परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. याशिवाय याबाबतचे निवेदनही आगार प्रमुखांना दिले. निवेदनातील माहिती अशी, शहर व परिसरातील अनेक नोकरदार, कामगार, व्यवसायिक, आणि प्रवासी …

Read More »

कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही

  खासदार प्रियांका जारकीहोळी; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना निपाणी(वार्ता) : शासकीय कामाच्या निमित्ताने अनेक नागरिक कार्यालयात येत असतात. त्यांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिला. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित तालुका …

Read More »

मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा स्थापना दिन गौरवशाली परंपरेला उजाळा देत साजरा…..!

  खानापूर : ९५ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षणदानातून बहुजन समाजाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेने सातत्यपूर्ण दिशा दिली आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्था स्थापना दिन व बालिका दिन (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती) यांचा संयुक्त सोहळा खानापूर येथे ताराराणी प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या स्थापनेमागील वैचारिक अधिष्ठान, सामाजिक बांधिलकी आणि …

Read More »

तिवोलीवाडा क्रॉस ते रेल्वे ब्रीज रस्त्याचा प्रश्न आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी; काम पुन्हा सुरू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी …

Read More »

खानापूर, बेळगाव सीमावर्ती भागात हत्तींच्या कळपाचा संचार; सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींचा कळप संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित गावे  बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, …

Read More »

निपाणी -लखनापूर ओढ्यावर २.७५ कोटी निधीतून पूल बांधकामाच प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : अनेक वर्षे मागणी असलेल्या निपाणी-लखनापूर रोडवरील केसरकर- वालीकर मळ्याजवळील ओढ्यावर पूल बांधण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्री सतीश जारहोळी यांनी २.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेविका अनिता पठाडे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, …

Read More »

युवक, युवतींनी सैनिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : खासदार प्रियांका जारकीहोळी

  तवंदीत सैनिक भवनाचा पाया खुदाई निपाणी (वार्ता) : आपण खासदार झाल्यानंतर आलेल्या पहिल्या निधीतून सर्वप्रथम सैनिकांच्या भवनासाठी २० लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १० लाख रुपये दिले असून लवकरच उर्वरित निधी देणार आहोत. जारकीहोळी फाउंडेशनतर्फे ८ केंद्रामधून तीन भाषांमधून सैनिक भरतीसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाते.त्याचा ग्रामीण भागातील …

Read More »

युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांमुळेच गावातील शाळांचा विकास : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक असून माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांचा कायापालट झाल्यास गावातील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. हलगा …

Read More »