Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

सुनीता निंबरगी यांची एसीएफपदी बढती

बेळगाव (वार्ता) : सौंदत्ती विभागाच्या वनक्षेत्रपाल म्हणून सेवा बजावणाऱ्या आएफओ सुनीता एम. निंबरगी यांना साहाय्यक अधिकारीपदी (एसीएफ) बढती मिळाली आहे. सुनिता निंबरगी यांनी यापूर्वी बेळगाव वन विभागात यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवेचा सुनीता निंबरगी विचार करून त्यांना बढती देण्यात आली आहे.बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या त्या ज्येष्ठ …

Read More »

‘आजादी का अमृतमहोत्सव’ चर्चासत्र संपन्न

बेळगाव (वार्ता) : शहरातील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या विषयावरील चर्चासत्र शुक्रवारी उत्तम प्रतिसादात पार पडले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली यानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. विनोद गायकवाड हे होते. आपले समयोचित …

Read More »

मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी कृतज्ञता गौरव सोहळा

बेळगाव : बेळगावातील मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा रुग्णालय आवारातील आय.एम.ए. सभागृहात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष सेवा बजावलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, धोका …

Read More »

खानापूरात गवळी धनगर समाजाची सोमवारी बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यातील गवळी धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या येथील रहिवासी असून त्यांना वन जमिनीचा ताबा कायम मालकी हक्काने मिळाला पाहिजे, यासाठी वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत चळवळीची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता येथील रवळनाथ मंदिरात बैठक बोलविण्यात आली …

Read More »

पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास कुप्पटगिरी गावातून पाठिंबा

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य …

Read More »

साहेब फाऊंडेशनवतीने कुसमळी गावात रोगप्रतिबंधक डोस

खानापूर (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशनच्यावतीने रोगप्रतिबंधक औषध वितरण करण्यात येत आहे. काल गुरुवारी खानापूर तालुक्यातील कुसमळी गावात रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली. साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवर खड्ड्यांचे साम्राज्य, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबाटी महामार्गाचे 5 कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून पारिश्वाड ते खानापूरातील शिवाजी नगरापर्यंतचे काम करण्यात आले. मात्र जांबोटी क्रॉसवर डांबरीकरणांचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यातच खानापूर-जांबोटी क्रॉसवरच्या प्रवेशद्वारावरच खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या प्रवाशाना तसेच वाहन चालकाना या खड्ड्यातून ये-जा करताना तारेवरची …

Read More »

खानापूर आम. डॉ. अंजली निंबाळकरांनी घेतली मुख्यमंत्री बोम्माईंची सदिच्छा भेट

बेंगळुरू : खानापूरच्या आम. डॉ अंजली निंबाळकर यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली. यावेळी आम. निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध समस्या आणि विकासकामासंदर्भात चर्चा ही केली. खानापूर मतदार संघातील विविध समस्या त्याचबरोबर नियोजित विकासकामे यासंदर्भात चर्चा करतानाच प्रामुख्याने …

Read More »

स्केटिंगपटू करुणा वाघेला जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित

बेळगाव (वार्ता) : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटिंगपटू करुणा राजन वाघेला हिला 2021 सालचा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मागील सात वर्षात तिने स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लखनीय कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिने स्केटिंग क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावीत अनेक …

Read More »

खानापूर विद्यानगरात रस्त्याची बोंब, नगरपंचायत लक्ष कधी देणार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्त्याची बोंब झाली आहे. रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी म्हणण्याची वेळ विद्यानगरातील रहिवाशाना आली आहे. मात्र याकडे नगरपंचायत, नगरसेवक डोळे झाक करत आहेत. खानापूर शहराचा कायापलट होणार असे भविष्य वर्तविण्यात येत आहे. शहरातील रस्त्याची दुरूस्ती, त्याचबरोबर उपनगरातील विद्यानगरात सध्या रस्त्याची महाभयंकर अवस्था …

Read More »