Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल : डॉ. आनंद पाटील

  कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाचा लहरीपणा शासनाच्या आडमुठे धोरण अशा विविध कारणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे अवलंबणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाल्यास देशही सुखी बनेल, असे मत …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त निपाणी परिसरातील शिवालयामध्ये ‘बम बम बोले’चा गजर

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील शिवालयामध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर, हर महादेवाचा गजर झाला. शिवाय दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळी आणि शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन महादेवांचे दर्शन घेतले. यावेळी …

Read More »

डॉ. उमा कुलकर्णीनी मराठी साहित्याला कन्नड संस्कृतीची ओळख करून दिली : डॉ. पुष्पा द्रविड

  बेंगळूरू : कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा समृद्ध परंपरा लाभलेल्या असून कन्नड साहित्यातील अनेक महत्वपूर्ण कृतींचे मराठीत अनुवाद करून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यविश्वाला कन्नड संस्कृतीची खरी ओळख करून दिली. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणजे मराठी–कन्नड भाषिक ऐक्याचा गौरव होय, असे प्रतिपादन जागतिक दर्जाच्या चित्रकार, शिल्पकार …

Read More »

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »

‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट

  डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …

Read More »

जिंदालजवळ बस आणि कार यांच्यात भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

  भरधाव मोटार डिव्हायडर ओलांडून केएसआरटीसी बसला धडक बंगळूर : शहराजवळील मादनायकनहळ्ळी परिसरातील जिंदालजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकली. या अपघातात मोटारमधील पाच युवकांचा मृत्यू झाला असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अपघात इतका भीषण होता …

Read More »

मौजे खैरवाडच्या मातीतून जागतिक नेतृत्वापर्यंतची थक्क करणारी झेप……!

  खानापूर : नंदगड शेजारील खैरवाड या छोट्याशा खेड्यात जन्मलेला एक जिद्दी विद्यार्थी आज जागतिक उद्योगविश्वात मानाचे स्थान मिळवतो, ही संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. परशराम कोलेकर यांची Stellantis या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग… इंडिया अ‍ॅण्ड पॅसिफिक या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. …

Read More »

पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी …

Read More »

शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे

  उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली …

Read More »

महाअभिषेक, महाप्रसादाने साई महोत्सवाची सांगता

  साईस्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण; दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : निपाणीयेथील साईशंकर नगर मधील साई मंदिरात दोन दिवसापासून आयोजित साई यात्रा महोत्सवात पालखी मिरवणुक, अभिषेक, पूजा, महाअभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१४) रात्री शेजारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, …

Read More »