Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!

  बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत असतात. पण आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारे अवलिया खूप कमी असतात. असाच एक अवलिया म्हणजे नाझर कॅम्प वडगाव येथील अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर असे म्हटले जाते की दुसऱ्याच्या दुःखाला सुखाचा अस्तर लावले की आपल्या दुःखाची धार …

Read More »

महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख

नवी दिल्ली : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा वादावरील खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील श्री. वैद्यनाथन आणि  शिवाजीराव जाधव यांनी ही विनंती न्यायालयात मांडली. यावर माननीय न्यायमूर्ती संजीवकुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी …

Read More »

“शौर्यवीर रन २०२५” स्पर्धेत बेळगावात धावले शेकडो धावपटू!

  बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी “शौर्यवीर रन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला. तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव …

Read More »

धरणे कार्यक्रम गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार; खानापूरात जनजागृती

  खानापूर : रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक श्री राजा शिव छत्रपती स्मारक येथे म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या …

Read More »

‘काळा दिना’च्या निषेध फेरीमध्ये सीमा समन्वयक मंत्र्यांना बेळगावात पाठवा; म. ए. समितीतर्फे पत्राद्वारे मागणी

  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी ‘काळा दिना’च्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या निषेध फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमासमन्वयक मंत्र्यांना बेळगावात पाठविण्यात यावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. भाषावर प्रांतरचना करताना सीमाभागातील ८६५ गावांतील मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाविरोधात समितीतर्फे १९५६ पासून एक …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व खजिनदार विनिता बाडगी उपस्थित होते. सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक …

Read More »

मलप्रभा नदीत बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) या तरुणाचा मृतदेह अखेर आज रविवारी 26 रोजी सकाळी सापडला आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊन बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शनिवारी सकाळपासून खानापूर अग्निशामक दलाचे जवानांनी …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीच्या व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द.  रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य व मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. …

Read More »

झेंडूचे दर गडगडल्याने ४ एकरातील फुले दिली मोफत; बेनाडीतील संदीप तावदारे यांचे धाडस

  दिवाळीनिमित्त वाटले २० किलो लाडू निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दर कमी करणे अथवा मोफत साहित्य वाटणे अशक्य आहे. पण याला बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप कल्लाप्पा तावदारे यांनी दिवाळी सणात झेंडूचे दर कमी झाल्याने चार …

Read More »

कार – दुचाकीच्या भीषण अपघातात अथणीत दोघांचा जागीच मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोराची होती की …

Read More »