Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

यंदा ऊसाची कमतरता असल्याने तोडणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

  बोरगांव येथील सभेत शेतकऱ्यांना आवाहन निपाणी (वार्ता) : जागतिक बाजारपेठेत साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे. उसापासून वीज व गॅस तया होत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर दिला जात नाही.ऊस वाहतूक, ऊस तोडणी कामगार, कारखानदार, पतसंस्था असे सर्व घटक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृती आले पाहिजे. …

Read More »

भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच ‘अक्का कॅफे’

  बेळगाव : बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू येथे “अक्का कॅफे” सुरू करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उप वनसंरक्षक, बेळगाव विभाग, क्रांती एन.ई. यांच्या उपस्थितीत आज जिल्हा पंचायत सभागृहात बैठक पार पडली. सदर बैठकीत के.आर.आय.डी.एल. विभागामार्फत अक्का कॅफेच्या इमारतीच्या रचनेचा आराखडा …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थी शिक्षकांची मुख्य टपाल कार्यालयाला भेट

  बेळगाव : आज राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कॅम्प बेळगांव येथील मुख्य टपाल कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीच्या वेळी पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी सर तसेच श्रीनिवास सर, दोडमणी सर या टपाल खात्याच्या …

Read More »

प्रति टन ४००० हजार रुपये दर घोषित केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

  रयत संघटनेचे हारूगेरी क्रॉसवर यल्गार आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने निश्चित केलेली यंदाच्या हंगामातील उसाची एफआरपी किंमत ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करणारी आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास सहमत नाहीत. या एफआरपीशिवाय किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४००० रुपये प्रति टन या दराने देण्यात यावा. …

Read More »

सद्गुरु पंत महाराज पुण्यतिथी भक्तीभावाने सांगता

  बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी समारंभात महाप्रसादाने आणि पंत महाराजांच्या श्री पालखीने सोहळ्याची सांगता मोठा उत्साहात झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार …

Read More »

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

  मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील …

Read More »

प्रगतीमध्ये मानवी मूल्ये, संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपावीत

  प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ …

Read More »

प्राथमिक शाळेत योग्य संस्कार मिळाले : निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे

  बिजगर्णी… शिक्षण हेच आयुष्य जगायला शिकवते. मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान जीवन जगण्याची प्रेरणा देते. मराठी प्राथमिक शाळेत उत्तम संस्कार मिळाले. 1951 मध्ये या शाळेत शिकलो. दान करणं हे पुण्य कर्म आहे आपल्या कडील काही इतरांना देऊन आनंद मिळवा.देण्याची वृत्ती ठेवा. शाळेचे उपकार कधी विसरू शकत नाही. शाळा ही आई समान …

Read More »

बेळगावचा दर्शन वरूर म्हैसूर दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत चमकला!

  बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन वरूर याने नुकत्याच पार पडलेल्या दसरा सीएम कप -2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक अशी दोन पदके जिंकून बेळगाव शहराचे नाव उंचावले आहे. म्हैसूर येथील चामुंडी विहार अ‍ॅक्वाटिक कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल येथे गेल्या दि. …

Read More »

अन्नभाग्य योजनेत पाच किलो तांदळाऐवजी मिळणार ‘इंदिरा फूड किट’

                      कृषी, पर्यटनाला चालना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा ५ किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी ‘इंदिरा फूड किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कृषी, …

Read More »