‘जनता त्रस्त… लोकप्रतिनिधी मस्त’ म्हणत काँग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. वीजपुरवठा, रखडलेली विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि सिंचन प्रकल्पांचा रखडलेला प्रश्न …
Read More »संततधार पावसाचा कहर; हब्बनहट्टीचे मारुती मंदिर पाण्याखाली
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर; मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली
खानापूर : तालुक्यातील कणकुंबी, जांबोटीसह पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम मलप्रभा नदीच्या पाणीपातळीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्याने मलप्रभा नदी वेगाने प्रवाहित होत असून, पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या …
Read More »खानापूरात मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळून जामगाव दोन दिवसांपासून अंधारात
बेळगाव : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जामगाव परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, जामगावसह परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत …
Read More »मोहिशेत गाव आजही चिखलाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा संताप
खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि …
Read More »डॉक्टर दिनानिमित्त इंजिनिअर-समाजसेवक प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेकडून गौरव
खानापूर : डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य व व्यवसायाने इंजिनिअर असलेले प्रसाद विठ्ठल पाटील यांचा केएलईच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. प्रसाद पाटील हे …
Read More »प्रथम स्मृतिदिनानिमित्त : संघर्ष, कर्तृत्व आणि माणुसकीचा सुगंध जपणारे कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर
“चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलविला… शून्यातून विश्व उभे केले, पण स्वतःसाठी जगणे मात्र विसरलात…” दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आम्हा सर्वांना कायमचे पोरके करून जाणारे माझे थोरले बंधू कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. पांडुरंग यांचा जन्म १० मार्च १९७० रोजी तिवोली …
Read More »चोर्ला मार्गावरील बससेवेच्या निवेदनाची दखल; दहा दिवसांत नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन
गुंजी येथे बस थांब्यासाठी निवेदन खानापूर : बेळगाव बसस्थानक ते चोर्ला नवीन बससेवा सुरू करावी तसेच या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी सरकारी हमी योजना अंमलबजावणी समिती, खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल हमी योजनेच्या …
Read More »डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व हार देऊन सन्मानित केले. यावेळी तालुक्यात आरोग्य …
Read More »स्व. मारुती दळवी : कर्तृत्व, संस्कार आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास
“गेलात आम्हा सोडून, राहिल्या मागे आठवणी… आठवणी मनी, स्मरणी; मार्गक्रमू या जीवनी…” माणूस जातो, पण त्याचे विचार, संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकीची ऊब कायम स्मरणात राहते. आमच्या दळवी कुटुंबाचा भक्कम आधारवड, मणतुर्गे पंचक्रोशीतील सर्वपरिचित व आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि माझे लाडके काका, स्वर्गीय मारुती नारायणराव दळवी यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने आमच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta