Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव

आनंदनगर अंधारात; तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव, नागरिक संतप्त!

  वारंवार खंडित होणारा व कमी दाबाचा वीजपुरवठा; घरगुती उपकरणे धोक्यात, हेस्कॉमच्या कारभारावर प्रश्नचिन्ह बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. थोड्याच वेळासाठी वीज आली तरी ती अत्यंत …

Read More »

भाग्यनगर येथे कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

  बेळगाव : बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जनजीवनाला बसत असून, सोमवारी भाग्यनगर येथील तिसऱ्या क्रॉसमध्ये एक मोठे झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सततच्या पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाल्याने रस्त्यालगतचे हे मोठे झाड अचानक कारवर …

Read More »

मतदार यादी अपडेटसाठी बीएलओची वाट पाहू नका!; घरबसल्या ऑनलाईन भरा “एसआयआर” फॉर्म, २९ जुलै अंतिम मुदत

  बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) 2026’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व नोंदणीसाठी २९ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी मराठी भाषिक मतदारांना कन्नड भाषेतील फॉर्म दिले जात …

Read More »

कावळेवाडीतील वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इ  पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. ‌ अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे …

Read More »

‘एसआयआर’च्या नावाखाली मराठी मतदारांवर घाला?

  एकाही मराठी भाषिकाचे नाव वगळू देणार नाही; बूथ निहाय यंत्रणा तातडीने उभी करण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आदेश बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांची नावे वगळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक मराठी भाषिक मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी समितीच्या …

Read More »

कृष्णा–पंचगंगा नदीला पूर; दत्त मंदिर परिसरात सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरासह बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संगमावर असलेले प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले असून, परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल …

Read More »

व्याजाच्या रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी, दोघे जेरबंद

  बेळगाव : बेकायदेशीररीत्या व्याजाचा धंदा करून कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना रायबाग पोलिसांनी रविवारी अटक केली. रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी आरोपींकडून ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत तब्बल १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही आरोपी आणखी पैशांची मागणी …

Read More »

26 व्या वर्षीही अखंड अमरनाथ यात्रेला प्रारंभ; कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यात्रेकरूंचा सत्कार

  बेळगाव : मागील 26 वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही बेळगाव शहरातून अमरनाथ यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमनाथ हलगेकर आणि अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ यात्रेसह बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री तसेच पंचकेदार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीही गतवर्षीप्रमाणे कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी मोठ्या संख्येने या पवित्र यात्रेत सहभागी झाले …

Read More »

हिरेण्यकेशी नदीच्या पाणी प्रवाहात वाढ; धुपदाळ जलाशयातून पाण्याचा विसर्ग

  बेळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिरेण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा परिणाम म्हणून धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. रविवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांनी घटप्रभा …

Read More »

रयत गल्लीत वीजपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

  बेळगाव : रयत गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी कधी रात्री १२ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत येत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. शहापूर …

Read More »